वडूज: येथील तहसिल कार्यालयाच्या आवारात झालेल्या ग्राहक पंचायतीच्या बैठकीत नागरीकांच्या विविध प्रश्नावर खडाजंगी चर्चा झाली. यावेळी बोलताना नायब तहसिलदार एस. व्ही. शिर्के म्हणाले, ग्राहक पंचायत हे ग्राहकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रभावी माध्यम आहे. या बैठकीस सर्व विभागाच्या प्रमुख अधिकार्यांनी जबाबदारीने उपस्थित राहने गरजेचे आहे.
यावेळी खटाव तालुका ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्रा डॉ पी डी कुलकर्णी, सौ. यशोधरा पेठे, पुरवठा विभागाचे शेंडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रीन शुगर सहकारी साखर कारखाना गोपुज (ता. खटाव) च्या गत वर्षाच्या थकीत बिलाबाबत सदस्यांनी आपल्या तीव्र भावना पुन्हा व्यक्त केल्या.
स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा वडूजच्या विस्कळीत एटीएम सेवेबद्दल, विलंबाने होणारे कँश वितरण, कर्ज वितरणात होणारा उशीर तसेच रास्त भाव दुकानदारांची शासकीय चलने भरुन घेण्यास होणारी टाळाटाळ याबाबत सखोल उहापोह करण्यात आला. संबंधीत अधिकारी यांनी वरिष्ठाशी चर्चा करुन ग्राहकांनाा न्याय देण्याचा प्रयत्न करतो असें सागितले. सध्याच्या पाणीटंचाईच्या काळात येरळवाडी मध्यम प्रकल्पातुन होणार्या बेकायदेशीर जल उपशाबाबत प्रश्न उपस्थित केला असता येरळवाडी मध्यम प्रकल्प कार्यालयाचे अधिकारी व्ही. के. पाटील म्हणाले म सध्या येरळवाडी मध्यम प्रकल्पात 115 परवानाधारक वीज ग्राहक आहेत तर 153 अनधिकृत वीज जोड कार्यरत आहेत त्याची यादी शासन दरबारी सादर करण्यात आली आहे. गत दहा वर्षे मध्ये एकाही शेतकरी ग्राहकाला पाणी परवाना देण्यात आलेला नाही. या प्रकल्पातून सध्या सात पाणी पुरवठा योजना कार्यरत आहेत.
सध्य स्थितीत 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. 39 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला की सर्व वीज जोड बंद केले जाणार आहेत. तहसील कार्यालयात कांही कामानिमित्त आलेल्या नागरिकांना वाहन लावण्यासाठी वाहनतळ उपलब्ध करण्यासाठी ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी मागणी केली असता बांधकाम विभागाकडून पट्टे आखुन कार्यवाही केली जाईल असे सांगण्यात आले. अँड. सुरज धुमाळ (रा. वाकेश्वर) यांच्या चार वर्षे पुर्वीच्या शेती पंपाच्या वीज जोडबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला पण अधिकारी उपस्थित नसल्यामुळे प्रश्नाला उत्तर मिळाले नाही.
गत महिन्याच्या मासिक बैठकीस अनुपस्थित असणार्या अधिकारी वर्गाला कारणे दाखवा नोटीस काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार जयश्री आव्हाड यांनी दिली यावेळी प्रा डॉ पी डी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सौ यशोधरा पेठे यांनी आभार मानले.
यावेळी गो. ज. कुलकर्णी, , सुभाष घाडगे, नारायण पाटील, अॅड. संदेश सातभाई,अशोक गाडवे, प्रा व्ही. व्ही जाधव, स्टेट बँक ऑफ इंडिया वडूजचे मेटकरी, श्रीमती पी. डी. कारंडे,एस. टी. आगारचे बोराटे, एस. एस. मोहिते, एच. आर. पाटोळे, बी. ए. भासले, व्ही. के. पाटील, पी. ए. सावंत तसेच ग्राहक उपस्थित होत.
ग्राहक पंचायतीच्या बैठकीत विविध विषयांवर खडाजंगी चर्चा
RELATED ARTICLES