फलटण: फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात सरडे येथील शालेय मुलांवर राजाळे येथे खोटा गुन्हा (कलम 395) दाखल करण्यात आला आहे.रामोशी समाजावर खोटे गुन्हा दाखल करून समाजाची पिळवणूक होत आहे.या संदर्भात जय मल्हार क्रांती संघटनेचे अध्यक्ष दौलतनाना शितोळे यांनी पालकमंत्री गिरिष बापट व मंञी राम शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली.
दरम्यान पालकमंत्री गिरिष बापट यांनी सांगितले की, रामोशी समाजावर यापुढे खोटे गुन्हे दाखल झाल्यास कोणालाही सोडले जाणार नाही. यापूर्वीही रामोशी समाजावर खोटे नाटे गुन्हे दाखल झाल्याचे बरेच प्रकार घडल्याचे वास्तव आहे.अशा कोणत्याही खोट्या गुन्ह्यात रामोशी समाजला त्रास होणार नाही हे सरकार रामोशी समाजाच्या बाबतीत होणार्या खोट्या गुन्ह्याविरोधात कठोर भूमिका घेईल असे मंत्री बापट म्हणाले.
पुढे मंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले की रामोशी समाजावर आण्याय होवू देनार नाही, तसेच राज्यातील रामोशी, बेरड, बेडर,नायका समाजावर वारंवार पोलिसांचा नाहक त्रास कायमस्वरूपी थांबवण्यासाठी लवकरच एक राज्यव्यापी बैठक घेवून रामोशी समाजाचे प्रश्न मार्गी लावू.असे त्यांनी स्पष्ट केले.