पाटण:- पाटण तालुक्यात ७ जून पासून आजअखेर पडत असलेल्या मुसळधार पाऊसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर कोयना विभागातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या शेतातील ऊसावर सततच्या पावसाने तांबोरा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. औषध फवारणीचा काही एक उपयोग होत नसून ऊसाची होणारी वाढ खुंटली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे हातचे आलेले ऊस पीक पुर्णतः वाया गेलेले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊस पीकाची पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत. व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी कोयना विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे शासनाला केली आहे.
या निवेदनात पुढे म्हणले आहे. ७ जून पासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने कोयना विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस पीकावर तांबेरा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे या ऊस पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त बोकाळनारा असून सततच्या पावसाने औषध फवारणीचा या रोगावर काही एक उपयोग झाला नाही. यामुळे ऊस पीकाची वाढ खुंटली आहे. ऊस पीक हातचे जाण्याची भीती निर्माण झाली असून ऊस उत्पादक शेतकरी उध्दवस्त होण्याची भिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने कोयना विभागातील ऊस पीकावर वेळीच लक्ष देवून झालेल्या नुकसानीचे नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी कोयना विभागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर युवराज साळुंखे
रामचंद्र साळुंखे, प्रकाश साळुंखे, परशराम बेबले, सदानंद साळुंखे, रघुनाथ साळुंखे, आनंदा सावंत, आनंदा सुर्यवंशी, आबासो साळुंखे, पंढरीनाथ सुर्यवंशी, जयवंत पवार, रमेश सावंत, आदींसह शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.
संततधार पावसाने ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव ; कोयना विभागातील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी
RELATED ARTICLES