म्हासुर्णे (प्रतिनिधी तुषार माने ): दुष्काळी भागातील सोसायटीने शंभर टक्के वसुल करुन आपल्या नफ्यातुन सोसायटीची इमारत उभी केली आणि त्या इमारतीत जिल्हा बॅक घेवुन सोसायटीच्या उत्पन्नात वाढ केली हि बाब अभिमानास्पद असल्याचे मत विधान परिषदेचे सभापती ना.रामराजे नाईक निंबाळकर यांनी मांडले, ते वडगाव (ज.स्वा) ता.खटाव येथे आयोजित केलेल्या सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात बोलत होते,
यावेळी आ.बाळासाहेब पाटील,माजी आ.प्रभाकर घार्गे,
जि.प .सदस्य सुरेंद्र गुदगे,जि.प.सदस्य प्रदिप विधाते,जिल्हा बॅक संचालक अर्जुनराव खाडे,मार्केट समिती सभापती सानप सर,प्रशासक सरव्यवस्थापक एस.एन.जाधव,उपव्यवस्थापक शेखर शिंदे, जि.प. अध्यक्षा भाग्यश्री भाग्यवंत,माजी समाजकल्याण सभापती मानसिंग माळवे, वडुज पं.स.सभापती कल्पना मोरे, प.स.सदस्या जयश्री कदम, पं.स.सदस्या रेखा घार्गे,माजी मार्केट समिती सभापती सी.एम.पाटील,विभागीय विकास अधिकारी उध्दव देशमुख,सुरेश पाटील उपसरपंच आदींची उपस्थिती होती,
आ.बाळासाहेब पाटील म्हणाले की सोसायटीच्या जागेसाठी आलेल्या अडचणी दुर करुन ही इमारत उभी राहीली आहे
त्यामुळे गावाच्या विकासास भर पडली आहे.त्याचप्रमाणे वडगाव ग्रामपंचायतीने पाणी शुध्दीकरणाचा प्रकल्प उभा करुन गावातील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली असल्याचे मत मांडले,
तद्नंतर माजी.आ. प्रभाकर घार्गे म्हणाले की सातारा जिल्हा बॅकेच्या माध्यमातुन वडगावच्या सोसायटीसाठी लागेल ती मदत केली आणि त्याचे फलित म्हणुन आज ही इमारतद आपल्या सेवेसाठी उभी राहिली आहे,
खटाव तालुक्यातील १०४ सोसायटीची बॅकपातळीवरील शंभर टक्के वसुली आहे, त्यामुळे सोसायटी सक्षमपणे
उभ्या असल्याचे मत मांडले,
दरम्यान ऋषांक सतीश घार्गे याचा तलवारबाजीमध्ये जिल्हयात पहिलानंबर व राज्यात गोदिंया येथे दुसरा नंबर आलेबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,
या कार्यक्रमास शिदोजीराव घार्गे,व्हा.चेअरमन नंदकुमार देशमुख,उपसरपंच समाधान घार्गे,वसंतराव घार्गे, दुटाळ सर रमेश बेलेकर, संजय घार्गे,संतोष पाटील, हणमंत भोसले बाबा चिंचकर,बाळासो वाघमोडे, राकेश सोरटे, श्रीनिवास पिसाळ, सुधाकर पिसाळ, उमेश पिसाळ अविनाश घार्गे,नवनाथ घार्गे विजय पिसाळ
पिंटू घार्गे,राजू होनराव,विलास शिंदे व पुसेसावळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ,
कार्यकर्ते, वडगावचे सोसायटीचे सभासद आदींची
उपस्थिती होती ,
प्रास्ताविक चेअरमन लक्ष्मण घार्गे यांनी केले,तर आभार सरपंच संतोष घार्गे यांनी मानले.