मेढा :- ( वार्ताहर ) जावळी तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून आज जावळी तालुक्यातील मेढा गावात नदी स्वछता प्रकल्प राबविण्यात आला.
सध्या संपूर्ण भारतात स्वछतेविषयी जनजागृती तसेच स्वछता विषयक विविध प्रकल्प मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. यासाठी शासन आणि विविध सामाजिक संस्था सुद्धा मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. मात्र स्वछता हि फक्त शासनाची जबाबदारी नसून ती देशातील प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. हीच जबाबदारी ओळखून जावळी तालुक्यातील नदी स्वच्छ करण्यासाठी जावळी मित्रमेळा व साथ सामजिक संस्था यांनी पुढाकार घेतला आहे. यांच्या माध्यमातून दि. १ डिसेंम्बर रोजी मेढ्यात नदी स्वछता कार्यक्रम राबविण्यात आला होता. सध्या सर्वत्र अस्वछता वाढताना दिसत आहे. आपल्या घरातील प्लास्टिक, थर्माकोल किंवा निसर्गाला बाधा पोहोचविणाऱ्या इतर गोष्टी माणूस बेफिकिरीने ओढ्यात, नदी काठाला टाकताना दिसतो. हा सर्व प्रकारचा कचरा नदीत जमा होतो परिणामी यामुळे नद्या खूप मोठ्या प्रमाणावर दूषित होत आहेत. ज्या नदीच पाणी माणूस, जनावरे पित असतात तेच पाणी अस्वछ झाल्यामुळे त्यांचा परिणाम हा निश्चितच मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.
मानवाने नदीत, ओढ्यात टाकलेला हाच कचरा, प्लास्टिक कालांतराने पुन्हा नदीकाठावर येतो. आणि नदीकाठी कचऱ्याचे ढीग साचू लागतात. हेच चित्र बदलाव आणि समाजात स्वचतेविषयक जागृती निर्माण व्हावी यासाठी या दोन्ही संस्थानी एकत्र येऊन नदी स्वछता प्रकल्पाला सुरुवात केली व आज मेढा ता. जावळी गावात स्वछता कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी नदी स्वछतेसाठी दोन्ही संस्थांचे ५० पेक्षा जास्त सदस्य व मेढा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केलेल्या कार्याबद्दल ग्रामस्थांनी दोन्ही संस्थांचे कौतुक केले.
जावळी मित्रमेळा व साथ सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून जावळीत नदी स्वछता प्रकल्पाला सुरुवात
RELATED ARTICLES