Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीजावळी पंचायत समितीच्या सभापतीपद आरक्षण नसताना प्रथमच ओबीसी महिलेला संधी

जावळी पंचायत समितीच्या सभापतीपद आरक्षण नसताना प्रथमच ओबीसी महिलेला संधी

सातारा :छत्रपती शिवराय यांच्या स्वराज्य स्थापनेसाठी सर्व मावळ्यांनी साथ दिली. त्याच जावळी तालुक्यात सर्वसाधारण महिलेसाठी मराठा समाजातील महिलेच्या राजीनामा घेऊन त्याठिकाणी ओ बी सी समाज्यातील महिला सौ जयश्री ताई गिरी यांना सभापती पदी बसवून क्रांतिकारी निर्णय घेतला.यावेळी विविध गावातुन स्वयंस्फूर्तीने ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही हा सोहळा पहाण्यासाठी आले होते.
राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या जावळी पंचायत समितीचे सभापती पदावर सर्वसाधारण आरक्षणामुळे मराठा महिला सदस्या सौ अरुणा शिर्के यांची मराठा क्रांती मोर्चा वातावरणमुळे निवड करण्यात आली. मराठा आरक्षण सरकारने जाहीर केलं. त्यामुळे सर्वसाधारण सभापती पदावर आता सर्वांचाच हक्क राहिला आहे. अशी धारणा राजकीय नेत्यांची झाली असावी म्हणून सौ. शिर्के यांचा तातडीने राजीनामा घेऊन त्यांच्या जागी सायगाव गणातून निवडून आलेल्या सौ. जयश्री ताई गिरी-गोसावी यांच्याकडे सभापती पदाची जबाबदारी दिली.अशी चर्चा यापूर्वीच सुरू झाली होती. विशेष म्हणजे त्यांचे पती सुहास गिरी-गोसावी यांनी ही जावळीचे सभापती पद भूषविले होते. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पती-पत्नीने सभापती पद मिळविण्याचे दुर्मिळ योगायोग घडला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त मराठा समाजाचा पक्ष उरला आहे. या टीकेला उत्तर देण्यासाठी जावळीच्या पंचायत समितीचे सभापती पद ओ बी सी महिलेला प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे मराठा समाजातील मातब्बर राजकीय, सामाजिक कार्यकर्ते या निवडीच्या वेळी उपस्थित होते. त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करीत आनंदोस्तव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ स्वाती देशमुख यांनी ही निवड जाहीर केली. जि प उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, प्रभारी उपसभापती दत्ता गावडे,जेष्ठ नेते शामराव पवार व सर्व पंचायत समिती सदस्यांनी नवनिर्वाचित सभापती सौ गिरी यांचे गर्दीतून वाट काढत स्वागत केले. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जावळीच्या सभापती पदी ओ बी सी महिलेला काम करण्याची संधी दिल्याबद्दल माजी सभापती कांतीभाई देशमुख ,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिलाध्यक्ष सौ सन्मिद्रा जाधव यांच्यासह अनेक जावलीकरांनी या निर्णयाला गतीमान व सर्व जाती धर्माला सामावून घेणारे नेतृत्व आमदारांच्या रूपाने लाभले आहे त्याबद्दल जावळीतील जनता भविष्यात त्यांना विक्रमी मतांनी निवडून देईल असा विश्वास व्यक्त केला. या निवडीनंतर खर्‍या अर्थाने राजकीय विकास पर्व गतिमान होईल असे वाटत आहे. दरम्यान, सभापती पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदा सायगावचे सुपुत्र व पत्रकार अजित जगताप यांना पत्रकार भूषण पुरस्कार मिळाला त्याबद्दल जावलीकरांच्यावतीने पंचायत समितीच्या आवारात सत्कार करून सभापती सौ गिरी यांनी सर्वधर्मसमभाव जपणार असल्याचे संकेत दिले आहे.गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी त्यांचे स्वागत केले. छत्रपती शिवराय यांच्या मामुर्डी गावातील शिवस्मारकाला सौ गिरी यांनी अभिवादन करून आशीर्वाद घेतले यावेळी सौ कविता धनावडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular