सातारा ः ज्योतिष हे एक परिपूर्ण शास्त्र आहे यामध्ये सिद्धांत व प्रमेय आहेत. हे शास्त्र समाजाला दिशा देणारे शास्त्र आहे. हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिष या विषयाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्योतिषांनी याचा विचार करुन जातकाचे मनोबल वाढवावे यासाठी या शास्त्रात संशोधन होणे गरजेचे आहे असे मत राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी सातारा येथे पश्चिम महाराष्ट्र ज्योतिष गौरव समितीतर्फे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले.
अधिवेशनास माजी आयुक्त श्याम देशपांडे, माजी आयुक्त चंद्रकांत दळवी, चंद्रकांत शेवाळे, विजय जकातदार, नंदकिशोर जकातदार, वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले, सौ. पुष्पलता शेवाळे, राजू जयभाये व शिरीष चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.
ज्योतिष या विषयाकडे बरेच जण साशंकतेने पाहतात. परंतु मी कॉलेज जीवनापासूनच या शास्त्राचा आधार घेवून इथपर्यंत आलो आहे. या शास्त्राची उपयुक्तता मोठी आहे व आपण सर्वांनी त्याचा स्वीकार केला पाहिजे असे मत माजी आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
ज्योतिषशास्त्राद्वारे भविष्य कथन करत असताना ज्योतिषांनी तारतम्य ठेवावयास हवे. योग्य दिशा दाखवणारे हे शास्त्र आहे असे प्रतिपादन माजी आयुक्त श्याम देशपांडे यांनी केले.
प्राचार्य रमणलाल शहा म्हणाले, ज्योतिष शास्त्र हे प्रत्यक्ष अनुभवाला येणारे व प्रचितीचे शास्त्र आहे. या शास्त्राद्वारे जीवनातील कोणतीही समस्या, अडचण व प्रश्न यांची उत्तरे देता येतात. आगामी संकटांबद्दल सूचना देता येते व आपण कोणत्या दिशेने गेल्यावर आपणाला यश मिळेल याबद्दल योग्य व अचूक मार्गदर्शन करता येते. सर्व ज्योतिष अभ्यासकांनी अत्यंत कठोरपणे अभ्यास करून आपल्याकडे येणार्या व्यक्तींना बुद्धिवादी दृष्टिकोनातून मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाकडे ज्ञानलालसा हवी आहे यासाठी आपण आध्यात्मिक ग्रंथांचे अधिकाधिक परिशिलन करण्याची गरज आहे.
नंदकुमार जोशी यांनी वेदमंत्र पठण केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी महेश कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकात अधिवेशनाचा हेतू सांगून स्वागत केले. याप्रसंगी ज्योतिषशास्त्राचे गाढे अभ्यासक ज्योतिर्विद प्राचार्य रमणलाल शाह यांना पश्चिम महाराष्ट्र ज्योतिष गौरव समितीतर्फे ङ्गज्योतिष महर्षीफ ही पदवी देवून सन्मानित करण्यात आले. तसेच भालचंद्र जोतिर्विद विद्यालय, पुणे यांचेवतीने चंद्रकांत शेवाळे यांच्या हस्ते ज्योतिष ङ्गजीवन गौरवफ पुरस्कार देवून प्राचार्य शहा यांना सन्मानित करण्यात आले. तसेच या अधिवेशनात सातारचे भूषण वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले यांचा प्राचार्य रमणलाल शहा यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी प्राचार्य रमणलाल शहा यांच्या ङ्गआनंदाचे डोहीफ या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या अधिवेशनात दत्तप्रसाद चव्हाण, विजय जकातदार, डॉ विकास खिलारे, श्रीधर कुलकर्णीं, डॉ. रजनी साबदे, सौ. नेहा शहा-दावडा, सौ. जयश्री बेलसरे, अॅड. मालती शर्मा, प्राचार्य रमणलाल शहा, नंदकुमार जोशी, दत्तात्रय चिवटे यांची विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने झाली.
या अधिवेशनात नंदकिशोर जकातदार यांना ङ्गजीवन गौरवफ पुरस्कार, चंद्रकांत शेवाळे यांना ङ्गजीवन गौरवफ पुरस्कार तसेच दत्तप्रसाद चव्हाण, दत्तात्रय चिवटे व नेहा शहा यांना ङ्गज्योतिष भूषणङ्घ पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. तसेच ज्योतिष मंडळ साताराचे बी. एस.प्रभुणे, रमण वेलणकर, अॅड. एन. डी. फडके, सौ. पद्मा कासट, अॅड. श्रीराम देव, महेश कुलकर्णी, नंदकुमार जोशी, अॅड. सौ. स्वप्ना अवसरे-पवार, गोविंद कोष्टी, अॅड. सूरज धुमाळ, सौ. अनुराधा हुमणे तसेच श्रीधर कुलकर्णी व डॉ. विकास खिलारे या सर्वांचा ज्योतिष क्षेत्रातील विशेष कार्याबद्दल मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. सौ. पुष्पलता शेवाळे यांचा षष्ठब्दीपूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.अधिवेशन यशस्वी होण्यासाठी अॅड. श्रीराम देव, महेश कुलकर्णी, अॅड. सौ. स्वप्ना पवार, गोविंद कोष्टी, सौ. पद्मा कासट, समाधान नलवडे, अतुल कुलकर्णी, अस्मिता सावंत, अश्विनी शेटे यांनी परिश्रम घेतले.अॅड. सौ. स्वप्ना अवसरे-पवार यांनी सूत्रसंचालन केल तर अॅड. श्रीराम देव यांनी आभार मानले.
ज्योतिष हे एक परिपूर्ण शास्त्र आहे : ना. चरेगावकर
RELATED ARTICLES