वाईः पाचगणी रस्त्यावर बाजूलाच असणार्या परंतु वाई नगर पालिकेच्या हद्दीत असणार्या झाडांवर पाटबंधारे खात्याने कसलीही तमा न बाळगता कुर्हाड फिरविली आहे. कालव्याच्या शेजारी असणार्या झाडांचीकोणाचीही परवानगी न घेताच बेसुमार झाडाची कत्तल केली आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रात असतानाशासन वृक्षारोपणावर करोडो रुपये खर्च करीत असताना आम्ही त्या गावचेच नाही असे मानून बेसुमार वृक्ष तोडीचा प्रकार घडल्याने पर्यावरण प्रेमींमधून संतापाची लाट उसळली आहे. मुख्य रस्त्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात कोणाचीही परवानगी न घेता सुस्थितीत असणार्याझाडांची इंधनासाठी कत्तल करणे हे पर्यावरणासाठी घातक बाब आहे, अशा प्रकारची वृक्षतोड अनेक वेळा या विभागाकडून करण्यात येते, कालव्याच्या दुरुस्तीसाठी सर्वात आधी शेजारीच असणार्या झाडांवर कुर्हाड फिरविली जाते, परंतु या विभागाकडून एकाही झाड लावण्यात येत नाही, नैसर्गिक आलेल्या झाडांचे संगोपन सुध्दा हा विभाग प्रामाणिकपणे करीत नाही ही दुर्दैवाची बाब आहे असे म्हणावे लागेल. कधी डोळे उघडणार प्रशासनाचे कोणताही विभाग प्रामाणिक पणे वृक्षतोडी संदर्भात निर्णय घेताना दिसत नाही. तरी पालिका प्रशासनाने त्वरित संबंधित विभागावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे. वाई तालुक्यात बेसुमार वृक्ष तोडीचे प्रस्त मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. सुधारणेच्या नावाखाली जवळपास 25 वर्षे जुनी ब्रिटीश कालीन वडाची झाडे वाई- सुरूर रस्त्यावर तोडण्यात येणार आहेत. सोशल मिडीयावरून आवाज उठविल्याने हे प्रकरण थंड आहे, परंतु सुधारणेच्या नावाखाली बांधकाम विभागाकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड करण्यात येते, झाडांच्या बुंध्याला आग लावण्यात येते अशा घटना वारंवार घडत आहेत. तरी वनविभागाने कोणाचीही तमा न बाळगता कारवाई करून या प्रकाराला आळा घालावा अशीही मागणी करण्यात येत आहे. वास्तविक पालिका हद्दीत मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी या प्रांताधिकारी, या तहसीलदार यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. वृक्षतोडीचेकोणत्याही विभागाला काहीही देणेघेणे नाही. ग्रामीण भागात काही शेतकरी कसलीही कोणाचीही परवानगी न घेता बिनदास्त पणे ब्रिटीश कालीन झाडे तोडण्याचे धाडस करीत आहेत. बांधकाम विभागाच्या हद्दीतील झाडे शेतीला अडचण होत आहे असे कारण पुढे करीत राजरोसपणे वनसंपदा नष्ट करीत असेल तर पर्यावरण संरक्षणासाठी प्रबोधनाची आज नितांत गरज असल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. अशी परिस्थिती सर्वत्र पहावयास मिळत असल्याने तहसीलदार, बांधकाम विभागासह, वनविभाग वाई तालुक्यात वृक्ष संरक्षणासाठी बेसुमार वृक्ष तोड करणार्यावर काय कारवाई करणार हाही प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित करण्यात आहे.
वाईच्या पाटबंधारे खात्याने कालव्याच्या शेजारील झाडांची केली बेसुमार वृक्षतोड
RELATED ARTICLES