वाई : गेल्या महिना भरातील कालव्यात सापडणार्या मृतदेहांचा उहापोह केल्यास हे अपघात अनवधानाने झालेत कि पुरावा नष्ठ या एकाद्याचा करण्यासाठी केलेला हा खटाटोप आहे. गेल्या महिन्यात एका मातेनेच स्वतःचे पाप लपविण्यासाठी पोटचा गोळा रात्रीच्या वेळेस पाण्यात ढकलून देवून पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न झाला होता, नियतीला ती गोष्ठ मान्य नव्हती म्हणून त्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे एकाचा आठवड्यात एवढ्या चुकीच्या घटना घडत आहेत, की कोणालाही संशय आल्याशिवाय राहत नाही. संपूर्ण आठ्वढाभर कालव्यात मृतदेह सापडण्याच्या घटनांनी पोलिसांना सुध्दा चक्रावून सोडले आहे, त्यामुळे वाई तालुक्यात एकच खळबळ माजली आहे, ज्या कालव्यांमुळे वाई तालुक्यातील लोकांचे राहणीमान बदलण्यास या जीवनमान उंचविण्यासाठी सिहांचा वाटा असताना त्याच कालव्यात दररोज एक या दोन मृतदेह सापडत असल्याने कालव्याकडे पाहण्याचा दृष्ठीकोन बदलण्यास सुरुवात झाली आहे, वाई तालुक्यातील भरून वाहणारे कालवे तालुक्यासाठी शाप कि वरदान हे ठरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कालव्यात मृतदेह सापडण्याचे मुख्य कारण शोधण्याचे वाई पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे ठाकले आहे. त्यामुळेही पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. प्रत्येक घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू पहात आहे. सापडला मृतदेह की कर पोष्ठ मार्टम आणि दे नातेवाईकांच्या ताब्यात एवढेच काम सध्या वाई पोलिसांना उरले असल्याचे दुर्दैवी चित्र तालुक्यात दिसत आहे. तसेच पाण्यात झालेल्या दुर्घटना डाव्या कालव्यातच घडत असल्याने संशयाला बळ मिळत आहे. तालुक्याच्या मध्यावरून वाहत असलेल्या कालव्यांचा उपयोग पुरावे नष्ठ करण्यासाठी होत असेल तर संस्कृतीच्या पंढरीत अशा चुकीच्या घटना घडत असतील त्याला जबाबदार कोण? हाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. अनेक वेळा अशा घटना या पोहायला जाणार्या मुलांच्या हलगर्जी पणामुळे झाल्याच्या समोर आल्या आहेत, तर काही बेवारस सापडलेलेमृतदेह हे शंका निर्माण केल्या शिवाय राहत नाहीत, तर काही दुर्दैवी घटना या कुटुंबातील जवळच्या व्यक्तीनेच घडविल्यास त्याठिकाणी संपूर्ण समाज वेठीला धरला जातो. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते, नात्याकडे पाहण्याचा दृष्ठीकोन बदलल्याशिवाय राहत नाही. स्वतःची आईच जर पुरावा नष्ठ करण्यासठी इतका टोकाचा निर्णय घेत असेल, तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. देशाच्या राजकारणात दिशा देण्याचे काम वाई तालुक्यातील दिग्गज मंडळीनी केले आहे, अशा सुसंस्कृत तालुक्याचे नाव अशा चुकीच्या घटनांमुळे बदनाम होत आहे. तरी वाई पोलिसांनी या घटना मागील खरे कारण शोधून चुकीच्या पायड्यांना बळ मिळणार नाही याची दक्षता घ्यावी एवढीच मापक अपेक्षा नागरिकांकडून करण्यात येत आहे.
वाई तालुक्याला वरदान ठरणारे कालव्यांचा उपयोग पुरावे नष्ठ करण्यासाठी होतोय की काय?
RELATED ARTICLES