कलेढोण: खटाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोक गेल्या दोन महिन्यापासूनच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जात आहेत. कलेढोण, मायणी परिसरातील अनेक गावातील लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी दिवसरात्र भटकंती करावी लागत आहे.
या भागातील काही गावांना शासनामार्फत टँकरने पाणीपुरवठा होत आहे. मात्र या कामात अनेक मर्यादा आहेत. त्यामुळे अनेक गावात सामाजिक संस्था, संघटना पाण्यासाठी पुढे येत आहेत. कानकात्रे येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एस. टी.) पुढे आली आहे. एस. टी. च्या माध्यमातून या गावासाठी दररोज दोन ते तीन खेपा टँकरने पाणीपुरवठा होणार आहे.
या योजनेचा शुभारंभ नुकताच महामंडळाचे प्रादेशिक अभियंता श्री. कुलकर्णी साहेब यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभागीय ंयंत्र अभियंता श्री. मोहिते, स्थापत्य अभियंता श्रीमती काशिद मॅडम, वडूज आगार प्रमुख विकास माने, वाहतुक निरीक्षक मोहनराव महाडीक, सुरेश कोळी, संतोष बोराटे, सरपंच मनिषा जाधव उपस्थित होत्या.
यावेळी तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर लोकांना दिलासा देण्यासाठी राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वतीने दुष्काळी भागातील काही गावांना मोफत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जाणार आहे. सध्या खटाव तालुक्यातील कानकात्रे व माण तालुक्यातील वावरहिरे या दोन गावांची निवड करण्यात आल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
कानकात्रेस एस. टी. कडून टँकरने पाणीपुरवठा
RELATED ARTICLES