साताराः रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी दि.22 ते 24 जानेवारी 2019 या कालावधीत राज्यस्तरीय महाविद्यालयीन वर्क्तृत्व स्पर्धेचे तसेच दि.17 ते 19 जानेवारी 2019 या कालावधीत राज्यस्तरीय आंतरमहाविदयालयीन प्रश्नमंजुषा स्पर्धाचे यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयुट ऑफ सायन्स, सातारा येथे आयोजन केलेले आहे. या स्पर्धाची माहितीपत्रके रयत शिक्षण संस्थेच्या …. या वेबसाईटवर उपलबध केलेली आहेत. त्यामध्ये स्पर्धेविषयीचे नियम व अटी, तपशील दिलेला आहे.
वर्क्तृत्व स्पर्धेसाठी विषय पुढीलप्रमाणे आहेत. रयत शिक्षण संस्थेची शतकपुर्तीः सामाजिक फलश्रृती, महात्मा गांधीच्या स्वप्नातील भारत, बहुरूपी पु.ल., मराठी चित्रपट सृष्टीचे बदलते अंतरंग, मिले सुर मेरा तुम्हाला असे विषय आहेत तसेच त्यामध्ये प्रथम पारितोषिक 15,000/- व स्मृतीचिन्ह, द्वितीय 10,000/- व स्मृतीचिन्ह, तृतीय रू. 5000/- व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ प्रत्येकी रू.3000 व स्मृतीचिन्ह, सांघिक चषक 1 टीमसाठी. तसेच प्रश्नमंजुषा स्पर्धेचा अभ्यासक्रम माहितीपत्रकात दिलेला आहे. तसेच बक्षिसामध्ये प्रथम क्रमांकाला रू.10,000/- व स्मृतीचिन्ह, द्वितीय क्रमांक रू.9,000/- व स्मृतीचिन्ह, तृतीय रू. 8000/- व स्मृतीचिन्ह, उत्तेजनार्थ रू.7000/- स्मृतीचिन्ह व उत्तेजनार्थ रू.6000 व स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके आहेत.
या स्पर्धाच्या प्रवेशिका स्विकारण्याची अंतिम तारीख वर्क्तृत्व स्पर्धेसाठी दि.12 जानेवारी 2019 असून प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी दि.10 जानेवारी अशी आहे. स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी कर्मवीर विद्याप्रबोधिनी सातारा फोन नं.02162-231074 वर संपर्क साधावा.
कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन
RELATED ARTICLES