सातारा : सातारा शहराची तहान भागणारा कास तलाव दुथडी भरून ओसंडून वाहू लागला असून, तलावात सुमारे 107 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. तलावाची पाणीपातळी 24 फुटांवर जाऊन पोहोचला आहे. तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने सातारकरांची पाणीचिंता मिटली आहे.
सध्या कास तलावाची उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे तलावात सध्यापेक्षा चौपट पाणीसाठा निर्माण होणार आहे. मात्र, हे काम करत असताना तलावातून बर्याच प्रमाणात पाणीगळती झाली. त्यामुळे त्याचा पाणीसाठ्यावर परिणाम झाला. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. एप्रिल-मे महिन्यांतच पाणीपातळी झपाट्याने कमी झाली, हे वास्तव आहे. त्यामुळे सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला कास व शहापूर पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केल्या जाणार्या भागात पाणीकपात करावी लागली. पाणी कपात करण्याची पहिल्यांदाच वेळ सातारा शहरावर ओढवली. पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पाणीपुरवठा सभापती श्रीकांत आंबेकरांनीही खस्ता खाल्ल्या. पावसाळा उशिरा सुरु झाल्याने कास तलाव कधी भरणार? याकडे लक्ष लागले होते. गेल्यावर्षी दि. 28 जूनच्या सुमारास तलाव भरला होता. मान्सूनचा पाऊस उशिरा दाखल झाल्याने तलाव भरण्यास आठ दिवस उशिर झाला. शनिवारी सायंकाळी उशिरा तलाव दुथडी भरुन वाहू लागला. तलावात 107 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला असून तलावाची पाणीपातळी 24 फूटांवर पोहोचली आहे. कास तलाव भरल्याने विशेषत: शहराच्या पश्चिम भागाचा पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे. कास तलावाचे पाणी शहापूर पंपिंग लाईनवरील भागसही देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
कास तलाव दुथडी भरून ओसंडून वाहू लागला
RELATED ARTICLES