सातारा : प्रधानमंत्री आवास योजनेतून गरिबांना घर मिळावे यासाठी शासन प्रयत्न करत आहे परंतु सातारा जिल्हातील काही अधिकारी कागदपत्रांवर विश्वास ठेवतात त्यामुळे काही प्रकरणे प्रलंबित राहतात याची जाणीव ठेवून सातारचे प्रांत अधिकारी स्वाती देशमुख यांनी शेंद्रे गावात कातकर्याच्या घरकुलासाठी पायपीट करून एक नवा आदर्श घडवला एक महिला असून देखील उन्हाची,खराब रस्त्याची तमा न करता आपले कर्तव्य समजून या कातकरी समाजासाठी पायपीट केली त्यामुळे शेंद्रे ग्रामस्थ देखील त्यांच्या कामकाजाचे कौतुक करू लागले आहेत.
कातकरी समाजासाठी शबरी आवास योजना कार्यान्वित झाली आहे .परंतु त्यांना जातीचा दाखला उपलब्ध होत नाही. या गोष्टींचा अभ्यास करून सातारचे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या सूचनेनुसार प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी एक वर्षांपूर्वीच त्यांना जातीचे दाखले उपलब्ध करून दिला. त्यानंतर ही योजना कार्यन्वित करण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्यय योजनेंतर्गत जागा मिळवण्यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले याला यश मिळाले. सातारा तालुक्यातील शेंद्रे गावात 28 हेक्टर वीस आर मुलकीपड गट न 286/ 1/2 या जागेची स्थळ पाहणी करून दिली त्यांनी या ठिकाणी गरिबांसाठी घरकुल योजना राबवण्याचा निर्धार केला आहे. यावेळी मंडळ अधिकारी नितीन घोरपडे, तलाठी साबळे, ग्रामविकास अधिकारी गोविंद माने, संपूर्ण स्वच्छता अभियानाचे अमित गायकवाड व मान्यवर उपस्थित होते. कातकरी समाजातील सोनू देवजी पवार, शालन पवार, पिंटू पवार, अशोक निकम, बाबु सोनू पवार आनंद निकम व घरकुल अभियंता रोहित सावंत उपस्थित होते. गेल्या दहा वर्षांपासून कातकरी समाज हा मच्छीमारी करून आपली उपजीविका चालवत आहे तसेच येथील छोट्या झोपडीमध्ये आपला निवारा शोधत आहेत. शासनाने अध्यादेश काढून अतिक्रमण केले आहे त्यांना ते देण्याचे ठरवले परंतु शेंद्रे येथील कातकरी वस्तीतील अतिक्रमण केलेली जमीन शासन दरबारी कोठेही नोंद नव्हती त्यामुळे कातकरी सामाज्याला जागा देण्यात अडचणी निर्माण होत होती याची जाणीव ठेवून शासकीय नियमाच्या आधीन राहून कातकरी समाजासाठी हक्काचे घर व्हावे म्हणून यासाठी प्रांताधिकारी स्वाती देशमुख यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले व स्वतः स्थळपाहणी करून त्यांनी कागदपत्रांच्या आधारे त्यांची नोंद करून घेण्यांचा प्रयत्न केला आहे. एक मोठा शासकीय अधिकारी पायपीट करून आपल्या समाजासाठी वस्तीवर येत आहे. यामुळे कातकरी समाज भारावून गेला. त्यामुळे प्रजासत्ताक दिन होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच या समाजाने खरी लोकशाही अनुभवली. प्रशासनामध्ये काम करण्याची उमेद असेल तर ते काय करू शकतात? त्याचे उत्तम उदाहरण निर्माण केले आहे त्यामुळे कातकरी समाजा सहकार व साखर कारखानापासून लांब असला तरी जिल्हा प्रशासनामुळे या समाजाला सुद्धा अधिकार मिळाला आहे. भविष्यात या समाजाला निवारा मिळाला तर या समाजातील मुले शिकून अधिकारी बनू शकतात असे सकारात्मक धोरण भाजप सरकार सत्तेतून दाखवून देत असल्याची माहिती भाजप युवा नेते रमेश उबाळे यांनी सांगितले.
कातकरी समाजासाठी सातारा प्रांताधिकार्यांनी केली पायपीट
RELATED ARTICLES