सातारा : शासनातर्फे रु.50 लाख मंजूर झाले आहेत.रामराज्याची कल्पना साकार करण्यासाठी अयोध्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारचे खेळ,शैक्षणिक मदत,वृक्षारोपण असे नानाविध उपक्रम राबविले आहेत. प्रभागात यापुढेही उत्तरोत्तर अधिकाधिक समाजोपयोगी कार्य करुन सातारा शहराचा नावलौकिक वाढवू.असा संकल्प असल्याचा निर्वाळा भाजपा नगरसेवक तथा अयोध्या फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार काटवटे यांनी दिला.
येथील अयोध्या फाउंडेशनच्यावतीने ज्ञानगंगा विद्यामंदिर (कात्रेवाडा)शाळा याठिकाणी, मल्लखांब महिला योग व नासिकबाजा या प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन, राष्ट्रीय मल्लखांबपट्टू सत्कार सोहळा, इ.10/12 वी उत्तीर्ण अध्ययणार्थींचा गुणगौरव सोहळा, फाउंडेशनचे माजी उपाध्यक्ष कै. विनायक कदम यांच्या स्मरणार्थ शालेय साहित्य व वृक्षारोपन असे नानाविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तेव्हा नगरसेवक विजयकुमार काटवटे बोलत होते.
मुख्याध्यापिका सौ.कविता बनसोडे म्हणाल्या, ज्ञानगंगा विद्यामंदिराचा कायापालट फाउंडेशनमुळे नक्कीच होईल.उत्तरोत्तर क्रीडा क्षेत्रात बालके गरूडभरारी घेतील.
सौ. माया मोहिते म्हणाल्या, मुला-मुलीवर विश्वास ठेवला तर ते क्रीडा जगतावर चमकतील.मल्लखांब व योगा यामाध्यमातून राष्ट्रीय खेळाडू तयार होतील.
शिवाय, आरोग्यही चांगले राहील. मल्लखांबाच्या माध्यमातून प्रियांका मोरे व तिच्या सहकारी वर्गाने राष्ट्रीय पारितोषिक पटकावले आहे.
अयोध्या फाउंडेशनचे कार्य आदर्शवत असून भविष्यकाळ उज्वल आहे.असे गौरवोद्गार विवेकशास्त्री गोडबोले, शरदभाई जानी, गणपतदास व गोपालदास शेठ यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. सचिन झिटे यांनी सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन केले. याकामी सौ.सुवर्णा घोरपडे, सौ.स्वाती देशपांडे, ऍड.सौ.शुंभागी काटवटे, ऍड.सौ.ओतारी, इंद्रजित फडतरे, गौरवदास शेठ, रमेश पितळे, किरण सडकर, वैभव तिखे,रणजित सुकटे,स्वाती तिखे, सौ.श्वेता झिटे, पप्पू पाष्टे, अभिषेक राजेशिर्के, सनी खांडेकर, प्रदयुूग्न आडके, तेजस माने, तन्मय नारकर, आशिष उईके, अनिकेत खांडेकर आदींनी अथक असे परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.
सातारा शहराचा नावलौकिक विविध उपक्रम राबवून वाढवला जाईल : काटवटे
RELATED ARTICLES