पुसेसावळी (प्रतिनिधी):-खटाव तालुक्यातील सकल मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने रविवारी येथील मूळपीठ डोंगरावर मूळपीठ निवासिनी श्रीयमाई देवीचे दर्शन घेऊन देवीचा जागर करून पारंपरिक पध्दतीने गोंधळ घालून मराठा समाजाला तातडीने आरक्षण देण्यासाठी साकडे घालण्यात आले. दरम्यान शासनाने सकल मराठा समाजाला त्वरित आरक्षण लागू करावे अशी मागणी ही यावेळी तमाम मराठा बांधवांनी यावेळी केली.
शासन मराठा आरक्षण देण्यासाठी वेळकाडू धोरण अवलंबत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज औंध भागातील तमाम मराठा बांधवांसह खटाव तालुक्याच्या अनेक भागातील मराठा क्रांती मोर्चा बांधव एकत्रित झाले होते.
आरक्षणाच्या मागणीचा लढा अखंडित पणे सुरू ठेवण्यासाठी सर्व मराठा बांधव येथील मूळपीठ डोंगरावर एकत्रित आले व देवीचे दर्शन घेऊन देवीचा जागर गोंधळ घालून हा लढा असाच सुरू ठेवणार असल्याची माहिती मराठा बांधवांनी दिली.
शासन जोपर्यंत मराठा आरक्षण जाहीर करीत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आपला लढा सुरू ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला त्यासाठी खटाव तालुक्यात गावोगावी कमिटया स्थापन करून समाजातील अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वानी प्रयत्नशील राहण्याचा निर्णय घेण्यात आला .
यावेळी औंंध,पुसेसावळी, खटाव,वडूज, मायणी,पुसेगाव,चोराडे,नांदोशी,बुध,
हिंगणे,येरळवाडी,उंबर्डे,कातरखटाव, व अन्य भागातून मराठा क्रांती मोर्चाचे सदस्य आले होते.
औंध येथील मूळपीठ डोंगरावर खटाव तालुका मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आरक्षणाबाबत शासनास जाग आणण्यासाठी देवीचा जागर करून पारंपरिक पध्दतीने गोंधळ घालून साकडे
RELATED ARTICLES