सातारा : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शिक्षणाचे अग्रणी केंद्र असणार्या देऊर, ता. कोरेगांव येथील श्री मुधाईदेवी शिक्षण संस्थेच्या प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरु करण्याची परवानगी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी विज्ञान शाखा सुरु होत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्परता दाखवल्याने हा विषय मार्गी लागला आहे. गेली अनेक दिवस प्रलंबित असलेला हा प्रश्न किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मदन भोसले यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आणि अवघ्या काही दिवसात प्रश्न मार्गी निघाला. याबद्दल मुधाईदेवीच्या पदाधिकार्यांनी मदन भोसले यांना धन्यवाद दिले असता याचे सारे श्रेय मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांचे असल्याचे विनम्रपणे सांगितले.
देऊर येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयात विज्ञान शाखा नसल्याने बीएसस्सीच्या शिक्षणासाठी परिसरातील विद्यार्थ्यांना दूरच्या ठिकाणी जावे लागत होते. तर विशेषत: अतिग्रामीण भागातील विद्यार्थींनीना मात्र बीएसस्सी शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे संस्थाचालकांकडून विज्ञान शाखेसाठी प्रयत्न सुरु होते. याबाबत संस्थाचालकांनी मदन भोसले यांची भेट घेवून या प्रश्नी लक्ष घालण्याची विनंती केली होती. त्यावर मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मुंबईत वर्षा या निवासस्थानी भेट घेवून या महाविद्यालयात विज्ञान शाखा मंजूर करण्याची विनंती केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागेवरच कार्यवाही करण्याचे आदेश मदन भोसले यांनी दिलेल्या निवेदनावर स्वत:च्या हाताने लिहून दिले होते. विशेष म्हणजे शिक्षणमंत्र्यांशीही स्वत: बोलण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मुख्यमंत्र्यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळेच मदन भोसले यांनी दिलेल्या निवेदनाला गती लाभली आणि अवघ्या काही दिवसांतच विज्ञान शाखा मंजूर झाल्याचे पत्र महाविद्यालयास प्राप्त झाले. संस्थाचालकांनीही तत्परता दाखवत याच शैक्षणिक वर्षापासून महाविद्यालयात विज्ञान शाखा सुरु करण्याचा निर्णय घेतला असून तो अंमलातही आणला आहे. त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष धनसिंग कदम, सचिव हणमंतराव कदम, विश्वस्त किसनराव कदम, सर्जेराव कदम, भिमराव कदम, प्राचार्य भारत भोसले आदींनी मदन भोसले यांची भेट घेवून शॉल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून व पेढा भरवून त्यांचा गौरव केला.
यावेळी मदन भोसले यांनी याचे संपूर्ण श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे असून आपण केवळ निमित्तमात्र असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र हिताची तळमळ आणि कार्यतत्परता कशी आहे याचेच हे उदाहरण असून त्यांच्याकडे सादर केलेली इतरही विविध कामे याच गतीने मार्गी लागत असल्याचे सांगितले. यावेळी किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष गजानन बाबर व संचालक मंडळाची उपस्थिती होती.
कार्यतत्परता मुख्यमंत्र्यांची.. मंजुरी विज्ञानशाखेची
RELATED ARTICLES