भुईंज : शेती, शेतकरी व सर्वसामान्यांमध्ये देव पाहणार्या ज्ञानोबा, तुकोबांच्या वारकरी सांप्रदायामध्ये वैचारिक अधिष्ठानालाही खुप महत्व आहे. नामयज्ञ सोहळा म्हणजे काय? याचा आपण विचार करतो तेव्हा हा नुसता सोहळा नसून समाजाला उचित दिशा देणारा विचार आहे असे मी मानतो. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनी यांनी आपल्या संतसाहित्यातून समाजकार्य करण्याची मोठी शिकवण दिली, हीच शिकवण किसन वीर कारखाना परिवाराने नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्ताने अखंडीतपणे समाजापुढे ठेवली आहे, याचा विशेष आनंद वाटत आहे. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या कल्पक नेतृत्वाखाली हा कारखाना फक्त पोटापाण्याचा प्रश्न सोडविणारा नसून या परीसरातील मानवी जीवनावर सकारात्मक प्रकाश पडावा, यासाठी खर्या अर्थाने प्रयत्नशील आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी केले.
किसन वीर साखर कारखाना कार्यस्थळावर आयोजित करण्यात आलेल्या सोळाव्या अखंड नामयज्ञ सोहळ्याचे उद्घाटन ज्येष्ठ मराठी सिनेदिग्दर्शक राजदत्त यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, डॉ. निलिमा भोसले, जिल्हा वारकरी संघटनेचे अध्यक्ष ह.भ.प.बबनराव सापते यांची प्रमुख उपस्थिती होती.
राजदत्त पुढे म्हणाले, गेली पंधरा वर्षे आपण हा नामयज्ञ सोहळा साजरा करित आहात याचा मी जेव्हा विचार करतो तेव्हा हा सोहळा नव्हेतर प्रत्येक मानवी जीवनाचे कर्तव्य असल्याचे मी मानतो. ज्ञानेश्वरी समजुन घेताना त्याचे आचरण आपण प्रत्यक्षात करतो का? याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. ज्ञानेश्वरीचा मुळ विचार समाजासाठी जगणे आहे. मदनदादांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी हा विचार खर्या अर्थाने शेतकर्यांचा चौफेर विकास साधीत सफल केला आहे.
बबनराव सापते म्हणाले, संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांनी वारकरी सांप्रदायाला योग्य मार्गदर्शन केले आहे. मदनदादा भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या नामयज्ञ सोहळ्यामध्ये तन, मन, धन खर्या अर्थाने शुध्द होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी दैवी संपत्ती आणि आसूरी संपत्ती याबाबतचे सखोल मार्गदर्शन उपस्थितांना केले.
अॅड. प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक करून राजदत्त यांचा परिचय करून दिला. ह.भ.प. चंद्रकांत उदावंत यांनी सुत्रसंचालन केले. कारखान्याचे संचालक नंदकुमार निकम यांनी स्वागत तर चंद्रकांत इंगवले यांनी आभार मानले. मान्यवरांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी केला. कार्यक्रमास कारखान्याचे संचालक रतनसिंह शिंदे, नंदकुमार निकम, सचिन साळुंखे, मधुकर शिंदे, चंद्रसेन शिंदे, विजय चव्हाण, विजया साबळे, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव, मोहनराव भोसले, माजी संचालक लालसिंग जमदाडे, शिवाजीराव गायकवाड, जयवंत साबळे, अशोकबुवा पाटणे, अनिल जोशी, प्रा. फडणवीस, विलासराव जाधव, भुईजचे उपसरपंच प्रशांत जाधवराव, वामनराव जमदाडे, माजी सरपंच बाळासाहेब कांबळे, भैय्यासाहेब जाधवराव, शेखर भोसले-पाटील, सुनिल शिवथरे, हणमंतराव गायकवाड, अमर धुमाळ, हरिभाऊ धुमाळ, हणमंतराव शिंदे, वारकरी, सभासद शेतकरी, कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी, महिला उपस्थित होते.
सकाळी ज्ञानेश्वर माऊली आणि ग्यानबा तुकारामांचा जयघोष, शिंग-तुतारी व टाळ मृदुगांचा गजर, वारकरी व कारखाना परिसरातील शाळांमधून आलेल्या बालसंतांच्या अभुतपूर्व उत्साहात ग्रंथदिंडी काढण्यात आली. भालदार चोपदार यांच्या नियंत्रणाखाली ग्रंथ दिंडीला सुरूवात होऊन कारखाना कामगार वसाहत, किकली गेट, माणकाई मंदिर, गाडीतळ मार्गे दिंडीने कारखाना कार्यस्थळावरील देशभक्त आबासाहेब वीर पुतळ्यामार्गे सामान्य प्रशासन कार्यालयासमोर आल्यानंतर मुलांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली.
आजपासून कृषी व पुष्पप्रदर्शन
दरम्यान बुधवार दि. 23 रोजी कारखाना कार्यक्षेत्रासह जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी किसन वीर साखर कारखान्याने कार्यस्थळावर कृषी व पुष्पप्रदर्शन आयोजित केले आहे. 23 ते 25 जानेवारीअखेरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. आज बुधवार दि. 23 रोजी सायंकाळी 4 वाजता आंतरराष्ट्रीय तबला वादक निशाद पवार व रूपक पवार यांची तबला जुगलबंदी होणार असल्याची माहीती, कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
किसन वीरमुळे समाजमनावर सकारात्मक प्रकाश : ज्येष्ठ सिनेदिग्दर्शक राजदत्त
RELATED ARTICLES