कोरेगाव : मुलीच्या जन्माचे स्वागत करणे हीच खरी भारतीय संस्कृती आहे कर्तुत्ववान स्त्रियांची भारताला खूप मोठी परंपरा आहे ही परंपरा आपण जपली पाहिजे असे प्रतिपादन महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांनी केले येथील बालविकास कार्यालयातर्फे आयोजित बेटी बचाव बेटी पढाव तालुकास्तरीय मेळावा आणि किशोरी मेळावा संपन्न झाला त्यावेळी उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पंचायत समिती सभापती राजाभाऊ जगदाळे सहाय्यक गटविकास अधिकारी अलमास सय्यद बालविकास अधिकारी ज्योत्स्ना कापडे सहाय्यक बालविकास अधिकारी प्रतिभा वांगीकर सामाजिक कार्यकर्त्या मनीषा बर्गे सर्व 15 विभागांच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या श्री जगदाळे म्हणाले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रमाबाई आंबेडकर जिजामाता आणि राणी लक्ष्मीबाई यांची प्रत्येक भगिनी ही वारसदार आहे हा उज्ज्वल वारसा या भगिनींनी प्राणपणाने जपावा. ज्योत्स्ना कापडे यांनी बेटी बचाव बेटी पढाव भाग्यश्री योजना आदी माहिती सुंदर विश्लेषणात्मक पद्धतीने सांगितले विविध योजनांचा लाभ घ्यावा असे त्यांनी प्रतिपादन केले
यावेळी माझी कन्या भाग्यश्री मुलीच्या जन्माचे स्वागत या उपक्रमाअंतर्गत लाभार्थींचे स्वागत सत्कार करण्यात आले किशोर यांचा मेळावा मोठ्या उत्साहात साजरा झाला तडवळे क्षेत्रातील गोळेवाडी च्या दिव्या घोरपडे आणि सातारारोड रोड क्षेत्रातील इशा फाळके यांचा सत्कार झाला तसेच आर्वी क्षेत्रातील सोनाली कोकरे आणि पिंपोडे बुद्रुक क्षेत्रातील आरोही भोसले यांचा सत्कार झाला लिंग गुणोत्तर उत्कृष्ट असल्याबद्दल चौधरवाडी ग्रामपंचायतीचा सत्कार करण्यात आला विशेष प्राविण्य प्राप्त मुलींचा सत्कार करण्यात आला भा त म वाडीच्या पूजा मंडले यांचा थाळीफेकमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल सत्कार झाला यावेळी बेटी बचाव बेटी पढाव असा संदेश देणार्या पोस्टर्सचे सुंदर प्रदर्शन भरवण्यात आले श्रीमती सय्यद श्री क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले मनीषा बर्गे यांनी किशोरींना सखोल मार्गदर्शन केले यावेळी सरस्वती हायस्कूल च्या किशोरी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या त्यांनी मुलींनी रोल प्ले सादर केला बेटी बचाव विषयी उत्कृष्ट मनोगत व्यक्त केले एकूणच मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पर्यवेक्षिका सुलभा मिसाळ यांनी सूत्रसंचालन केले पर्यवेक्षिका काजी यांनी आभार मानले मुलींनी आपले आरोग्य जपावे आणि प्रगती साधावी असे प्रतिपादन श्रीमती अलमास सय्यद यांनी केले.
कोरेगावात निनादला नारीशक्तीचा गजर अन किशोरी मेळावा
RELATED ARTICLES