भुईंज : विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरीच्या वाटेवर असलेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांची सेवा करण्यासाठी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने यंदा चौदाव्या वर्षीही पिण्याच्या पाण्याचा टँकरची सोय केलेली आहे. कारखान्याचे सभासद दुर्योधन कदम, दिलीप सुर्वे,कारखान्याचे फायन्सास विभागाचे जनरल मॅनेजर अशोकराव शिंदे, सौ. शिला जाधव – शिंदे, सौ. वर्षा अहिरेकर-जाधव यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि कारखान्याचे संचालक सचिन सांळुखे, मधुकर शिंदे,चंद्रसेन शिंदे आणि कार्यकारी संचालक अशोक जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत पुजन करून पुंडलिक वरदे हरि विठ्ठल.. च्या गजरात पाण्याचा टँकर रवाना करण्यात आला.
यावेळी कारखान्याचे फायन्सास मॅनेजर टी.जी.पवार, चीफ अकौंटन्ट पी.बी. गायकवाड, एचआर मॅनेजर ए. टी. शिंगटे, इन्चार्ज ऊस विकास अधिकारी ए. जे. ढमाळ, सुरक्षा अधिकारी एस. एम. बर्गे, लीगल इन्चार्ज एल.बी.शेळके, हेवी व्हेईकल इन्चार्ज राजेंद्र भोईटे, विकास डेरे यांच्यासह कर्मचारी, वारकरी उपस्थित होते.
हरिनामाच्या गजरात किसनवीरचा पाण्याचा टँकर रवाना
RELATED ARTICLES