म्हसवड: सैन्यात 22 वर्षे देशसेवा करून मिळालेली पुंजी मतिमंद मुलांचे जिवन घडविण्यासाठी खर्च करणार्या माजी सैनिक दत्तात्रय कोळी व नलिनी कोळी या दामप्त्यांचे कार्य मतिमंद मुलांसाठी वरदान ठरत असल्याचे उदगार डॉ. राजेंद्र जाधव यांनी काढले.
म्हसवड येथील नलिनी फौंडेशन संचलित प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्राच्या वतीने नुकताच आजी- माजी सैनिक व विधवा पत्नींचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी डॉ. जाधव अध्यक्ष पदावरून बोलत होते.
यावेळी नगरसेवक धनाजी माने, डॉ.स्वप्निल जाधव प्रा.सचिन होनमाने,गब्बर काझी,फौडेशनच्या चेअरमन नलिनी कोळी आदिमान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. जाधव म्हणाले माजी सैनिक दत्तात्रय कोळी यांनी 22वर्षे सीमेवर देशसेवा केली.या सेवेतून मिळालेली पुंजी व मिळणारी पेन्शनही ते मतिमंद मुलांचे जिवन घडविण्यासाठी खर्च करत आहेत. हे काम करणात माजी सैनिक दत्तात्रय कोळी व त्यांच्या पत्नी नलिनी कोळी हे सामाजिक बांधिलकी च्या भावनेतून झोकून देऊन काम करत आहेत.
या दामप्त्यांचे हे कार्य मतिमंद मुलांसाठी वरदान ठरत असून दुष्काळी माणदेशातील मतिमंद मुलांसाठी हे दामप्त्य देवदूत बनले त्यांना घडविण्यासाठी निश्चितच हे कार्य प्रेरणादायी असल्याचे जाधव यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नलिनी फौंडेशन संचलित प्रेरणा मतिमंद मुलांचे प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्रच्या चेअरमन नलिनी कोळी यांनी आजीमाजी सैनिक दिगंबर झेंडे, गणेश कोकरे, दत्तात्रय कोळी,प्रभावती पुंड वेणूताई रसाळ, सचिन कोकरे, जगन्नाथ खरात,रामचंद्र पवार, यांचा संस्थेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रास्ताविक नलिनी कोळी यांनी केले तर आभार दत्तात्रय कोळी यांनी मानले.कार्यक्रमास सचिन पडळकर, पोलिस पाटील सुभाष काळेल, भाऊसाहेब चव्हाण, अजित शिर्के, महादेवराव साठे, दयावान जाधव, विष्णू सुतार आदि मान्यवर उपस्थित होते.
कोळी या दामप्त्यांचे कार्य मतिमंद मुलांसाठी वरदान: डॉ.राजेंद्र जाधव
RELATED ARTICLES