पाटण:- कोयनेचा भूमिपुत्र म्हणून शासनाचे प्रतिनिधीत्व करणारे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे कोयनेत कार्यकर्त्यांच्या वास्तुशांत स्नेह भेटीला येतात. पण कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या आंदोलन स्थळाला वळसा घालून खुशकीच्या मार्गाने शासकीय विश्रामगृहावर जातात. गेली १४ दिवस कोयना धरणग्रस्त घरदार सोडून ठिय्या आंदोलनाला बसले असताना राज्याचा मंत्री कोयनेत येतात आणि आंदोलनालकडे पाठ फिरवतात यासारखे दुसरे दुर्दैव नसावे. हे तर धरणग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच झाले.
महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या कोयना प्रकल्पात ज्यांच्या जमिनी घेतल्या आणि ज्या प्रकल्प ग्रस्ताना देशोधडीला लावले. गेल्या ६४ वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात कोयनेच्या भूमीपुत्रांचा वाट्याला अवहेलना आणि दुःख दारिद्र्य आले. स्वताच्या संसाराची राख रांगोळी करून देश विकास कार्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची परवड करून घेतले ते महान त्यागी प्रकल्प ग्रस्त गेली १४ दिवस कोयनानगर येथे ठिय्या आंदोलनास बसले आहेत. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता हे प्रकल्प ग्रस्त ठिय्या आंदोलन करून सरकारकडे आपले न्याय हक्क मागत आहेत आम्हाला भीक नको तर कायद्याने मान्य केलेले अधिकार आणि हक्क द्या असे म्हणणारे हे प्रकल्प ग्रस्त १४ व्या दिवशीही आंदोलनावर ठाम आहेत. गेल्या १४ दिवसात अनेक अधिकारी जिल्हा प्रशासन यांनी भेटी देऊन आंदोलकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला पण निर्ढावलेले नेते मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवून आहेत. याचे उदाहरण म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे कोयनांनगरला येतात पण आंदोलन शेजारी असणाऱ्या रस्त्याने विश्राम गृहाकडे जाण्या ऐवजी दुसऱ्याच बाजूने आड मार्गाने विश्रामगृहाकडे जातात ,सर्व पक्षीय आंदोलनात आम्ही कोयना प्रकल्प ग्रस्त या उद्देशाने श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अद्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन गेले १४ दिवस शांततेचा मार्गाने चालू आहे. राज्याचे बांधकाम मंत्री कोयनेत येतात आणि आंदोलन स्थळी न येताच परत जातात हीच चर्चा आंदोलन स्थळावर चालू असल्याचे दिसत आहे.
कोयनेचा भूमिपुत्र म्हणून शासनाचे प्रतिनिधीत्व करणारे कोयनेचे पुत्र आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे कोयनेत कार्यकर्त्यांच्या वास्तुशांत स्नेह भेटीला येतात ,पण कोयना प्रकल्प ग्रस्ताच्या आंदोलन स्थळाला वळसा घालून खुशकीच्या मार्गाने शासकीय विश्रामगृहावर जातात. महाराष्ट्राला तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या कोयना प्रकल्पात ज्यांच्या जमिनी घेतल्या आणि ज्या प्रकल्प ग्रस्ताना देशोधडीला लावले ,गेल्या ६४ वर्षात प्रचंड मोठ्या प्रमाणात कोयनेच्या भूमीपुत्रांचा वाट्याला अवहेलना आणि दुःख दारिद्र्य आले ,स्वताच्या संसाराची राख रांगोळी करून देश विकास कार्यासाठी ज्यांनी आपल्या जीवनाची परवड करून घेतले ते महान त्यागी प्रकल्प ग्रस्त गेली १४ दिवस कोयनानगर येथे ठिय्या आंदोलनास बसले आहेत. थंडी वाऱ्याची तमा न बाळगता हे प्रकल्प ग्रस्त ठिय्या आंदोलन करून सरकारकडे आपले न्याय हक्क मागत आहेत आम्हाला भीक नको तर कायद्याने मान्य केलेले अधिकार आणि हक्क द्या असे म्हणणारे हे प्रकल्प ग्रस्त १४ व्या दिवशीही आंदोलनावर ठाम आहेत.
गेल्या १४ दिवसात अनेक अधिकारी जिल्हा प्रशासन यांनी भेटी देऊन आंदोलकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला अनेक नेते मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवून आहेत, याचे उदाहरण म्हणजे मंत्री एकनाथ शिंदे कोयनांनगरला येतात पण आंदोलन शेजारी असणाऱ्या रस्त्याने विश्राम गृहाकडे जाण्या ऐवजी दुसऱ्याच बाजूने आड मार्गाने विश्रामगृहाकडे जातात ,सर्व पक्षीय आंदोलनात आम्ही कोयना प्रकल्प ग्रस्त या उद्देशाने श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अद्यक्ष डॉ भारत पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन गेले १४ दिवस शांततेचा मार्गाने चालू आहे ,राज्याचे बांधकाम मंत्री कोयनेत येतात आणि आंदोलन स्थळी न येताच परत जातात हीच चर्चा आंदोलन स्थळावर चालू असल्याचे दिसत आहे ,