पाटण:- ( शंकर मोहिते ) कोयना धरणग्रस्तांचे गेले २२ दिवस श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली कोयना येथे ठिय्या आंदोलन सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कोयना धरणग्रस्तांनी केला होता. या आंदोलनाच्या २२ व्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाकडे गांभीर्याने पहात श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मुंबई येथे विधानभवनात आज सोमवार दि. १९ रोजी चर्चेला बोलावले या झालेल्या चर्चेत कोयना धरणग्रस्तांच्या बाजुने सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत अधिकृत माहिती कोयना येथे धरणग्रस्तांच्या आंदोलन ठिकाणी सांगणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील प्रवीणसिंह परदेशी प्रधान सचिव , जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर, खा. उदयनराजे भोसले, आ. शंभूराज देसाई, संपत देसाई, हरिश्चंद्र दळवी भगवान भोसले ,प्रकाश साल, बळीराम कदम, विविध खात्यांचे सचिव, अधिकारी श्रमिक मुक्ती दलाचे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई येथे विधानभवनात झालेल्या चर्चेत कोयना वार रूमची स्थापना,पात्र प्रकल्प ग्रस्तांचे संकलन करताना सरळ वारसदार ( बहिणीसह स्वतंत्र वारसदार धरणे आणि कायद्या नुसार धरण प्रकल्पाचा विस्तार आणि इत्यादींच्या बाधित झालेल्या प्रकल्प ग्रातांच्या संकलन तयार करणे ), महावितरंनाच्या सर्व व जलसंपदाच्या सर्व सवलती मिळणे, 2013 चा केंद्राचा कायदा लागू करणे, कोयनेच्या लाभ क्षेत्राला स्लॅब लावणे, सरळ वारसदारांना स्वतंत्र खातेदार धरणे,
नापीक वगैरे जमिनी दिलेल्याना पर्यायी जमीन देणे,
शिवसागराच्या भोवती ल्यानंड पूल तयार करणे,
सिंचनाचे वीजबिल आणि घरगुती वीजबिल शून्य करणे
, नोकऱ्या न मिळलेल्याना ५ लाख नाहीतर नोकऱ्या देणे, लाभधारक कारखान्याच्या मध्ये नोकऱ्या देणे,
पर्यटन व्यवस्था प्रकल्प ग्रस्तांच्याकडे देणे, प्रक्रिया व ऊर्जा निर्मिती उद्योगांना वीज भांडवल देणे,जमीन ना मिळलेल्याना दरमहा १५ हजार निर्वाह भत्ता देणे,
व्याघ्र प्रकल्प ग्रस्थानच्या पुनर्वसनाची १००% पूर्तता करणे, पर्यावरण विकास कमिटीसाठी जनतेचा विकास आराखडा अंमलात आणणे या सर्व विषयावर असणाऱ्या मागण्या वर सकारात्मक चर्चा झाली असून याबाबत कोयना येथे धरणग्रस्तांच्या आंदोलनात झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती देऊन आंदोलनांची पुढील दिशा ठरवणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.
चौकट :- श्रमिक मुक्ती दलाचे प्रमुख डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली गेले २२ दिवस कोयना धरण ग्रस्तांचे सुरू असलेले आंदोलना संदर्भात आज विधानभवनात मुख्यमंत्र्यांच्या बरोबर झालेल्या चर्चेत सकारात्मक वळणावर गेले आहे. कोयना धरण ग्रस्तांचे प्रश्न डॉ भारत पाटणकर यांच्या प्रयत्नातूनच सुटत आहेत. आंदोलनाच्या २२ व्या दिवशी मुख्यमंत्र्यां बरोबर झालेली बैठक डॉ. भारत पाटणकर यांच्या प्रयत्नामुळे आणि प्रसिद्धी माध्यमांनी आंदोलनाला केलेली साथ यामुळे यशस्वी झाली. मात्र या बैठकी वरुन नेत्यांचा श्रेयवाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. बैठकीचे श्रेय घेण्याचा असा कोनी नेत्याने प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू असे कोयना धरणग्रस्त आंदोलकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.