Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकोयना प्रकल्प ग्रस्तांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगारांचे असेल : डॉ भारत...

कोयना प्रकल्प ग्रस्तांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकरी आणि कामगारांचे असेल : डॉ भारत पाटणकर

पाटण:- कोयना प्रकल्प ग्रस्तांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर 23 ते 26 जानेवारी रोजी केलेल्या ठिय्या आंदोलनाचा शासनाने कसलीच दखल घेतली नाही.15 दिवसात रजिस्टर संकलन करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी यांनी दिली होती मात्र तोही कालावधी संपला.मुख्यमंत्र्यांनी मीटिंग लावली नाही.महाराष्ट्रासाठी विकास पर्वासाठि त्याग करणाऱ्या कोयना प्रकल्प ग्रस्तांना 57 वर्ष तिष्ठत ठेवले आणि आत्ता पण शासन दाखल घेवून प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करणार नसेल तर प्रकल्प ग्रस्त गप्प बसणार नाहीत. आता पुढील २६ फेब्रुवारी रोजी होणारे कोयना प्रकल्प ग्रस्तांचे आंदोलन हे तीव्र असेल. असे भारत पाटणकर यांनी कोयना येथे धरण ग्रस्तांनच्या बैठकीत सांगितले. यावेळी कोयना धरण ग्रस्तांनच्या वतीने छत्रपती शिवजयंती साजरी करण्यात आली.

भारत पाटणकर पुढे म्हणाले कोयना प्रकल्प झाला तेव्हा प्रकल्प ग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा केला नव्हता मात्र कोयना धरणानंतर झालेल्या सगळ्या धरणांसाठी मात्र कोयना धारणानंतर झालेंक्या सर्व धरणांच्या धारण ग्रस्तांना न्याय दिला कोयना धरण ग्रस्त गेली 57 वर्ष शासनाशी झगडतायत तरीही शासनाला जर जाग येत नसेल तर आत्ता मात्र बेमुदत आंदोलन कोयनेच्या पाण्यात जलसमर्पण आणि कोयनेचे विजगृह ताब्यात घेऊन बंध पाडणे या खेरीज प्रकल्प ग्रस्तांकडे पर्याय उरला नाही ,आणि शासनाने आत्ता याची वाट पाहू नये , कोयना प्रकल्प ग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या ऑफिस मध्ये जाऊन पडले आहे तरी कोयनेच्या प्रकल्प ग्रस्तांसाठी स्वतंत्र वॉर रुम का सुरू करू नये , ज्या प्रकल्प ग्रस्तांनी आपल्या सर्वस्वाचा होळी करून राष्ट्र विकासाठी हातभार लावला ते प्रकल्पग्रस्त आजही उपेक्षित जीवन जगत आहेत यासारखी दुर्दैवी बाब कोणती ?
कोयनेच्या प्रकल्प ग्रस्तांपैकी 1500 खातेदारांना अंशतः जमिनी दिल्या आहेत,जवळ जवळ 1500 खातेदार आजही जमिनीपासून वंचित राहिले आहेत , व जवळ जवळ 1000 खातेदारांना परस्पर जमिनी नावावर टाकल्या त्या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनाच माहीत नाहीत,ज्या जमिनी दिल्या त्या ही नापीक आहेत त्यांना पाणी देणे हे 1986 च्या आदेशानुसार लिखित असताना शासनाने आजपर्यत या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा चालविली आहे
आज कोयना प्रकल्प ग्रस्तांची चौथी पिढी आंदोलनासाठी सज्ज झाली आहे ,मात्र या पिढीच्या हातून कोणतेही अनुचित कार्य घडू नये ही खबरदारी शासनाने घ्यावी,येत्या 26 फेब्रुवारी पासून हेच प्रकल्प ग्रस्त कोयनानगर येथे आपल्या बायका मुलांसह बेमुदत आंदोलनास बसत आहेत , येणारा होळीचा सण शासनाच्या नावाने बोंबाबोंब करून आंदोलनास बसणार आहेत ,अशी माहिती डॉ भारत पाटणकर यांनी कोयनानगर येथे शिवजयंती साजरी करताना दिली ,यावेळी हरिश्चंर दळवी बळीराम कदम संभाजी चाळके शिवाजी साळुंखे श्रीपती माने दाजी पाटील यांची भाषणे झाली ,

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular