Wednesday, June 25, 2025
Homeताज्या घडामोडीकृष्णा नदीतील गौण खनिजावर धनदांडग्यांचा डल्ला

कृष्णा नदीतील गौण खनिजावर धनदांडग्यांचा डल्ला

वाई ः वाईच्या पश्चिम भागात कृष्णा नदीच्या पात्रात बेसुमारमातीचे उत्खनन चालू असून हजारो ब्रास माती अनधिकृतपणे काढण्यात आली आहे,कृष्णा नदीत गौण खनिजावर तालुक्यातील धनदांडग्यानी डल्ला मारला आहे, त्यामुळे महसूल विभागाच्या लाखो रुपयांच्या नुकसानीला जबाबदार कोण असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे. नदीच्या पात्रात दहा ते पंधरा फुटाचे खड्डे काढण्यात आल्याने मृत्यूचा सापळा तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे, या भागातील नागरिकांसाठी अपघाताचा मार्ग तयार करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. प्रांत, तहसीलदार यांच्या मेहरबाणीमुळे बेकायदा उत्खनन करणारे धनदांडगे ऐवढे मस्तवाल वागत आहेत. की त्यांना कुणाचीही भीती उरलेली नाही. माती उत्खनन करून वाहतूक करणारे डंपर चालक गाड्यांना घासणे व लोकांच्या अंगावर गाडी घालण्या इतपत त्यांची मजल गेली आहे, त्यातून एकाद्याने जाब विचारल्यास वाईतून गुंड बोलावून त्यांना मारहाण करण्याचे प्रकार घडले आहेत. जीवे मारण्याची धमकी देण्यात येते. हे सर्व प्रशासनाची मदत असल्याशिवाय होवूच शकत नाही, माती उत्खननाच्या प्रकरणात प्रचंड प्रमाणात भ्रष्ठाचार होत असल्याचे बोलले जात आहे. गाड्या आडव्या मारणार्‍या वाहनांवर तक्रार दाखल करण्यात आली तरीही पोलीस कसलीही चौकशी न करताच वाहने सोडून देतात, वाई पोलीस सुध्दा कारवाईचा दिखावा करीत असल्याचा आरोप या भागातील ग्रामस्थ करीत आहेत. तरीहे त्वरित थांबविण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा नुकताच निवेदनाव्दारे इशारा देण्यात आला आहे, तसेच माती उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा आंदोलन करून उध्वस्त करण्यात येईल याची सर्व जबाबदारी प्रशासनाची असेल,त्याचप्रमाणे वेळेतच या धन दांडग्याना प्रशासनाने रोखले नाही तर या भागाच्या वतीने जनआंदोलन श्री, काळेश्वर ट्रस्टच्या माध्यमातून उभारण्यात येणार असल्याचे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. श्री, काळेश्वरी ट्रस्टच्या सदस्यांनी कृष्णा नदीची पहाणी करून माती उत्खनन केलेल्या ठिकाणाचा आढावा घेण्यात आला आहे. निवडणूक निकालानंतर लगेचच वाईच्या पश्चिम भागाच्या वतीने माती उत्खनन करणार्‍या धनदांडग्यांच्या विरोधात महामोर्चाचे आयोजन करून जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार, व वाई पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात येणार आहे, गौण खनिज उत्खनन करणार्‍या माफियांनी कृष्णा नदीचे पात्रच बदलण्याचा प्रयंत्न केला आहे. या माफियांवर त्वरित कारवाई करण्यात येवून कृष्णामाईचे होत असलेले हाल थांबविण्यात यावेत तसेच वाईच्या पश्चिम भागात असणार्‍या नदीतील मातीचे होत असलेले अवैध उत्खनन याचीही त्वरित चौकशी करण्यात येवून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.पश्चिम भागातील आसरे, रेनावळे,खावली,व वडवली या गावातील नदी क्षेत्रातील माती जेसीपीच्या सहाय्याने अवैध व अतिरिक्त माती उत्खनन होत आहे.दररोज किमान 100ते150डंपरची वाहतूक होत आहे.त्या डंपरवर गाडीचा नंबर टाकलेला नसतो, हा एक प्रकारचा गुन्हा असून तो प्रशासनाच्या मदतीने करण्यात येत आहे. धरण पात्रात दहा ते पंधरा फुटाचे खड्डे तयार झाले आहेत.पावसाळ्यात अशा ठिकाणी नेहमीच अपघात होतात,धरणात बुडून दुर्घटना किती होण्याचे संबंधित खाते वाट पाहत आहे.असा प्रश्न या निमित्ताने उपस्तीत केला जात आहे.या भागातील लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असून त्यावर प्रशासनाने गांभीर्याने घेवून त्वरित उपाय काढावा अन्यथा श्री, काळेश्वरी ट्रस्टव स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारणार असल्याचेही ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष- ज्ञानदेव शेठ सणस यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular