म्हसवड : सातारा – लातूर महामार्गाचे रंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गत दोन वर्षापासून सुरु असून या कामाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम संथगतीने सुरु आहे.हे काम गतीने सुरू करून लवकरात लवकर पूर्ण न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रवाशी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पोपट बनसोडे यांनी दिला आहे
सातारा – लातूर महामार्गाचे रंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम गत दोन वर्षापासून सुरु असून या कामाकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम संथगतीने सुरु असून पंढरपूर ते म्हसवड हा रस्ता पूर्ण होत आला तरी म्हसवड सातारा ह्या भागाकडील रस्त्याचे काम संतगतीने सुरु असून हे काम कधी पूर्ण होणार ? संबंधित यंत्रणा डोळे मिटून का पाहत आहेत, वाहनधारकांना या सुरु असलेल्या रस्त्याच्या कामातुनच जीव मुठीत धरुन वाहने चालवत प्रवास करावा लागतो तरी जलद गतीने हे काम पूर्ण व्हावे अशी मागणी वाहनधारकांतुन केली जात आहे.
या रस्त्याचे काम गत दोन वर्षा पासून सुरु असून जुना डांबरी रस्ता पूर्ण पणे उखडून टाकुन ठीक ठिकाणी मुरुम टाकला आहे. या कच्च्या रस्त्यावर कुठे ही पाणी न मारल्याने वाहणांच्या वर्दळीमुळे सततची धुळ उडत असून असंख्य खड्ड्यामुळे अनेक दुचाकी चालक व वाहनधारकांना अनेक शारिरीक व्याधी झाल्या असुन श्वसनाचे आजार जडले आहेत.
तर अनेक छोटे मोठे आपघात घडले असून अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत. या मार्गावर गोंदवले खुर्द मध्ये जनार्धन पोळ वस्ती नजीक काम रखडले असून ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉली मुळे रस्ता मोठ्या प्रमाणात आरला असून यात मोठ-मोठे खड्डे पडले त्यामुळे अवजड वाहतुकीला मोठा त्रास होत असून दुचाकीधारकांच्या गाड्या या खड्ड्यामुळे घसरून पडत आहेत. म्हसवड येथून दहिवडीकडे जाणार्या रस्त्यावर पवारवस्ती पाटीवर तर रस्त्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराने एकाबाजुचा रस्ता तीन महिन्यांपासून एक साईडचा सुमारे पाच फूट एक साईड खोदून ठेवला आहे तसेच पिंगळी खुर्द येते सुरू असलेल्या काम जवळ खडीचे ढीग टाकले असून तिथे कोणताही दिशा दर्शक फलक लावला नाही.तर अनेक नवीन रस्त्याचे काम झाले असून तिथे ही खडीचे ढीग अचानक टाकले जात असून वळण आहे किंवा या ठिकाणा वरून हळूने प्रवास करा असे फलक लावण्यात आले नसल्याने याठिकाणी रात्रीच्या वेळेस एखादा मोठा आपघात घडण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी रस्त्याची एक लेन झाली आहे त्या ठिकाणी पण रस्ता भरून घेण्यासाठी टाकलेली माती पूर्णतः रस्त्यावर पसरत असून धुळीमुळे वाहनचालकाला पुढचा रस्ता दिसत नाही तरी वेळीच हा रस्ता पूर्ण करुन वाहनधारकांना दिलासा द्यावा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे बनसोडे यांनी सांगितले.
या महामार्गाच्या कामामुळे खाजगी वाहनांचे प्रचंड नुकसान होत असून तालुक्यात शिखर शिंगणापूर, म्हसवड,गोंदवले बुद्रुक ही तीन देवस्थान मोठी असून खराब रस्त्यामुळे भाविकांची संख्या रोडावली आहे.
सातारा-लातूर महामार्गाचे काम गतीने पूर्ण करावे : पोपट बनसोडे
RELATED ARTICLES