सातारा -: संपूर्ण देशात कोरोना विषाणूंचा झपाट्याने होत असलेल्या प्रसार आणि त्यामुळे जाहीर करण्यात आलेली टाळेबंदी यामुळे मार्चच्या मध्यापासून बहुतांश मंगल कार्य रद्द झाली आहेत आणि अशा कार्यावर उपजीविका करणाऱ्या व्यावसायिकांचे उत्पन्न पूर्णपणे थांबले आहे .परिणामी या व्यवसायाशी संबंधित असणारे जिल्ह्यातील सुमारे बाराशे कामगार हतबल झाले आहेत .
प्रशासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी या व्यावसायिकांनी केली आहे .सातारा शुभ मंगल कार्य व्यावसायिक विकास संस्था नावाची लग्नसराईशी संबंधित व्यावसायिकांची संघटना आहे .पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संघटनेत मंगल कार्यालयांचे मालक. मांडव वाले.वाजंत्री,ध्वनीयंत्रणा ,वाढ पी, फुलांची सजावट करणारे, फोटोग्राफर्स, व्हिडिओ ग्राफर, पुरोहित भटजी आदींचा समावेश आहे. विवाहाचे मुहूर्त मार्च ते मे या कालावधीत अधिक असतात .त्यामुळे व्यावसायिकांचे उत्पन्नाचे हेच मुख्य कमाईचे दिवस असतात.
मार्चच्या मध्यापासून लग्नकार्य जवळजवळ थांबल्यामुळे सोशल डिस्टसिंगचे नियम लागू करण्यात आले होते. आणि आता मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत विवाह विधी करावेत असा निर्देश प्रशासनाने दिले होते. लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर पुढील सर्व विवाहविधी रद्द करण्यात आले आहेत. आता टाळेबंदी चा दुसरा टप्पा सुरू झाल्याने 3 मे पर्यंत तोचालणार आहे. तोपर्यंत लग्नसराईची संबंधित व्यावसायिकांना जवळजवळ दररोज काम मिळते ते पूर्णपणे थांबले आहे .लग्नसराईत या व्यावसायिकांकडे अनेक कामगार हंगामी स्वरूपात काम करतात. त्यांनाही या दिवसात चांगले उत्पन्न मिळते. परंतु मंगल कार्य पूर्णपणे थांबल्याने आणि स्थगित झाल्याने व्यवसायिकांना काम मिळणे बंद झाले आहे. आणि जिल्ह्यातील अशा बाराशे कामगारांवर लग्नसराईत बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे .
या संघटनेचे अध्यक्ष उदय गुजर ,उपाध्यक्ष शंकर साळुंखे, राम हादगे, राजू भोसले, सचिव संजय देशपांडे ,खजिनदार भरत वैष्णव यांनी प्रशासनाकडे या संदर्भात आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला .मात्र सध्या प्रशासन विषाणूचा प्रसार रोखण्याचे व्यस्त असल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही .आणि जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांचा संपर्क होऊ शकला नाही असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले .त्यामुळे बेरोजगारीची झळ सोसत असलेल्या बाराशे कामगारांची प्रशासनाने दखल घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.