Saturday, June 21, 2025
Homeसातारा जिल्हापाटणघर वापसी करणाऱ्या गावच्या लेकरांना माणूसकी दाखवा.. ; "गड्या माझा गावच बरा.."...

घर वापसी करणाऱ्या गावच्या लेकरांना माणूसकी दाखवा.. ; “गड्या माझा गावच बरा..” अस म्हणणाऱ्या लेकरांना “गड्या माझा शहरच बरा..” असे म्हणण्याची वेळ आणू नका.

पाटण:- ( शंकर मोहिते ) – संपूर्ण जगात थैमान घातलेल्या कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्या पासून भारतात लौकडाऊन चालू आहे. गावावरून मुंबई – पुण्यासारख्या शहरात पोटापाण्यासाठी गेलेल्या गावच्या लेकरांना या लौकडाऊन चा मोठा फटका बसला आहे. दहा बाय दहाच्या खोलीत मुलाबाळांसह परिवार संभळताना याकाळात नाईलाजाने उपाशी पोठी राहून गावची ओढ दरलेल्या व गावात आल्यानंतर मायेचा आधार मिळेल या अपेक्षेने परतलेल्या या लेकरांना सावत्र आई पेक्षा माणुसकी हिन दर्जाची वागणूक मिळत असल्याने “गड्या माझा गावच बरा..” अस म्हणनाऱ्या लेकरांना “गड्या माझा शहरच बरा..” असे म्हणन्याची वेळ आली आहे.
मुंबई – पुण्यासारख्या शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. दिवसेंदिवस शहरात कोरोना रुग्णांची होणारी वाढ लक्षात घेता राज्य व केंद्र सरकारने शहरातील गर्दी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात वास्तव्यास असलेला चाकरमानी सुरक्षितेच्या कारणास्तव गावाकडे धाव घेत आहे. हा चाकरमानी गावाकडे येत आसताना शासनाने घालून दिलेल्या अटी – शर्तीचे पालन करून येत आहे. गावात आल्यानंतर गावच्या नियमाने राहण्यास देखील तो तयार आहे. तरी देखील या गावच्या लेकरांकडे एखाद्या रोग्यासारखे बघण्याची माणसीकता स्थानिक गावकऱ्यांनी ठेवली आहे. हे दुर्दैव आहे.
इतरवेळी पुणे – मुंबई कर गावच्या जत्रेला पाहिजे, गणपती उत्सवाला पाहिजे, दुर्गादेवी उत्सवाला पाहिजे, आदी – मदी येणाऱ्या प्रत्येक वर्गणीला पाहिजे. पुणे – मुंबई करांशिवाय गावच चालू शकत नाही. अशी माणसीकता झालेल्या गावकऱ्यांनी कोरोनाच्या भयाण संकटात शहरातून घर वापसी येणाऱ्या लेकरां विषयी माणुसकीच सोडली आहे. गाव वाल्यांनो जरा तरी लाज बाळगा.. गावच्या सुरक्षितेसाठी बाजूला राहणाऱ्या तुमच्याच लेकरांना तुमचा मायेचा आधार हवा आहे. त्यांच्याकडे हिन नजरेने पहाण्यापेक्षा त्यांच्या सुरक्षतेची काळजी घ्या. त्यांना ऐकटे बाजूला टाकू नका. त्यांच्या लहान सहान पिलांना मायेचा आधार द्या. भविष्यात हिच मुल तुमच्या गावचा आधार आहेत. आज त्यांच्यावर आलेली वेळ नैसर्गिक आहे. त्यांना आज दुखवलत तर ती भविष्यात तुम्हाला दुखवील्याशिवाय राहणार नाहीत.
गावचे गट-तट राजकारण बाजूला ठेवून घरवापसी लेकरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था वेळेवर करा. त्यांना काही नको हवे ते वेळेवर बघा. त्यांची आरोग्य तपासणी एक दिवसाआड वेळेवर करा. त्यांना आपलेपणा दाखवा. आणि त्यांचा कोरोणटाईंन कालावधी संपल्यानंतर त्यांना सन्मानाने गावात सामील करून घरवापसी करा. तरच गावाविषयी त्यांच्या मनात मानसन्मान जागृत राहील.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular