Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसातारा शहरालगत खेड मध्ये संचारबंदीने कष्ट करी, मजुरांची तीन दिवस उपासमारी   

सातारा शहरालगत खेड मध्ये संचारबंदीने कष्ट करी, मजुरांची तीन दिवस उपासमारी   

सातारा दि. सातारा शहरालगत असलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संचारबंदीचा निर्णय लादण्यात आला त्यानुळे गरीब ,कष्टकरी मजुरांवर  तीन दिवस उपासमारी लादण्यात आली असल्याची खंत गरीब कुटूंबातील लोक व्यक्त करीत आहेत   .                                    सातारा शहरालगत राष्टीय महामार्ग तसेच सातारा- कोरेगाव रस्त्यावर विस्तारलेल्या खेड ग्रामपंचायत हद्दीत संगमनगर, विकासनगर, पिरवाडी, कृष्णनगर, वनवासवाडी, प्रतापसिहनगर अशी गरीब व मध्यम वर्गीयांची वसाहत आहे. तसेच नवीन सोसायटी व बंगले,लघुउद्योग यांचे जाळे आहे. त्यामुळे आर्थिक सुबत्ता आहे तर दुसऱ्या बाजुला कष्टकरी, मजूर ,भाजीवाले, फेरीवाले, रिक्षावाले व छोटी -मोठी कामे करणारी कुटुंबे राहतात दररोज मिळणाऱ्या रोजगारी वर उपजीविका चालते. त्यांचा विचार न करता कोरोना काळातील गैरसोय दडपण्यासाठी स्थानिक पातळीवर संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुळातच एवढ्या मोठ्या वसाहती मध्ये साधी रुग्णवाहिका नाही. कोविड सेंटरचा पत्ता नाही. निम्या लोकांना अद्यापही लस मिळाली नाही. आरोग्याचा बोजवारा झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थेपासून ते संसदे पर्यंत  दुर्लक्ष केले आहे. त्याची झळ सर्वसामान्यांना सहन करावी लागत आहे . आधी पुनर्वसन नंतर धरण अश्या पद्धतीने अगोदर आरोग्य सुविधा  नंतर संचारबंदी करणे गरजेचे असताना खाजगी कामाला मदत करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना खुश करण्यासाठी ही संचारबंदी लादली गेली आहे. अशी माहिती कष्टकरी आणि मजुरांनी दिली आहे. शासकीय शिवथाळी सोडाच पण लोकांना  शासकीय योजनेतील मोफत शिधा मिळाला नाही. त्याबाबत कोणीही आवाज उठवला नाही. पण संचारबंदी यशस्वी झाल्याची चित्र निर्माण करण्यात येत आहे. हे म्हणजे गरीबाच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. कष्टकरी, मासेमारी करणाऱ्या गरीब वस्ती मध्ये या संचारबंदीने शोककळा पसरली आहे. संचारबंदी लादण्याची वेळ का आली? याचे आत्मचिंतन करण्याची  कोणालाही सवड नाही. जिल्हा प्रसासनाने आरोग्य व पुरवठा विभागाने योजनेतील शिधा, ऑक्सिजन बेड , लसीकरणाची सुविधा पूर्ण केल्यानंतर संचारबंदीची गरज भासली  नसती.आता ‘वराती मागून घोडे’ धावण्याचा प्रकार केला जात आहे. वाड्या-वस्तीत खाद्यपदार्थ शोधण्यासाठी गरोब पालकवर्ग जीवाचे रान करीत असून लादलेल्या संचारबंदीने गरिबांना आजपासून दि २एप्रिल पर्यंत उपसमारी शी लढावे लागणार हे मात्र निश्चित झाले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular