Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीपाटण तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी असताना लॉकडाऊन मधून शिथीलता द्या :-...

पाटण तालुक्यात कोरोनाची रुग्ण संख्या कमी असताना लॉकडाऊन मधून शिथीलता द्या :- विक्रमबाबा पाटणकर

पाटण:- जिल्हाधिकारी यांचा आठ दिवसाचा कडक बंद पाटण तालुक्यात अविचारी व अन्याय कारक आहे. या लौकडाऊनचा पाटण तालुक्यात कोणताही संबंध नसताना अकारण जनतेला त्रास व जनतेची गैरसोय करणारा आहे. एप्रिल- मे महिन्यातील रुग्ण संख्या विचारात घेता पाटण तालुक्याला या लौकडाऊन मधून सवलत मिळणे गरजेचे होते. व्हेण्टीलेटर चा एकही बेड नसताना व इतर कोणत्याही चांगल्या पध्दतीची आरोग्य सुविधा नसताना जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण पाटण तालुक्यात सापडले असून कोरोना मुक्त होण्याचे प्रमाण सुध्दा अधिक आहे. असे असताना गव्हाबरोबर किडा रगडला जातो त्याप्रमाणे पाटण तालुक्याची परस्थिती निर्माण केलेली आहे. तरी पाटण तालुक्याला या लौकडाऊन मधून जिल्हाधिकारी यांनी वगळावे अशी मागणी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी केली.

आज पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मालाला कौवडीचाही मोल मिळत नसून आज शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी मुळे शेतकरी प्रचंड आडचणीत सापडलेला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे शेतखऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले असून त्याचे पंचनामे देखील प्रशासनाने केलेले नाहीत. खरी वस्तुस्थिती पाटण तालुक्यात जुलै औगस्ट महिण्यामधे खरीप पिकांची लागवड चालू होत असताना प्रचंड पावसामध्ये शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करावे लागत असते. त्या दरम्यान लोकांची प्रतिकार शक्ती कमी होत असते. या दरम्यान लोकांचे आजारी पडण्याचे प्रमाण अधिक असते हा आज पर्यंतचा अनुभव आहे. यामुळे पाटण तालुक्यातला आता चालू असलेल्या लौकडाऊन मधून वगळून जुलै-औगस्ट मध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले तर लौकडाऊन टाकणे योग्य ठरेल. पाटण तालुका दुर्गम व डोंगराळ असून वनकुसवडे, मळे-कोळणे, जिंती-सातर, पाणेरी-हुंबरवाडी सारख्या गावांना २५ ते ४० कि.मी. अंतरापर्यंत कोणतेही बाजार पेठ नाही. तालुक्यातील समाज गरीब कुटुंबातील असून या आठ ते १५ दिवसामध्ये खते बीबियाने कर्ज प्रकरणे जिवणावश्यक वस्तूंचा साठा करणे. तसेच बैल- म्हैस खरेदी विक्री करावी लागणार आहे. या गोष्टी या काळात जर झाल्या नाहीत. तर त्यांचे कधी न भरून येणारे नुकसान होणार आहे. या गोष्टीचा जिल्हाधिकारी यांनी विचार केलेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या हातातील कायद्याचा वापर करताना जिल्ह्यातील तालुक्यांच्या वाढता कोरोनाचा प्रभावाचा अहवाल घेऊन जिल्हा हे युनिट न बघता तालुका हे युनिट धरून लौकडाऊन टाकावे. शेतकरी व्यापारी, कामगार, हातगाडी, फेरीवाले, यांच्या उध्दरनिर्वाणाची सोय करावी अशी मागणी विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular