Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीकोरोनाच्या नावाखाली सर्व सामान्य शेतकरी आम जनता भरडली जात आहे -: ...

कोरोनाच्या नावाखाली सर्व सामान्य शेतकरी आम जनता भरडली जात आहे -: विक्रमबाबा पाटणकर.

पाटण :- कोरोनाच्या प्रार्श्वभुमिवर संपूर्ण देश राज्य जिल्हा तालुका लौकडाऊन असून जनता प्रशासनाला पुर्ण पणे सहकार्य करत आहे. आज अशा परस्थितीत राज्य सरकारने केलेला कायदा जिल्हाधिकारी मानत नाहीत. जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश नगरपंचायत मानत नाहीत. पोलिसांचा या सर्व गोष्टींशी काही संबंध नसल्यामुळे खाकी वर्दी चा दाख दाखवून जनतेची पळथाबुई थोडी करणे हे नित्याचे काम झाले आहे. खर वास्तविक विक्रमसिंह पाटणकर यांना गेले अनेक वर्षाचा कामाचा अनुभव आहे. तर नुकतेच मंत्री झालेले शंभुराज देसाई यांचा प्रशासनावर दबदबा आहे असे दाखवतात मग पाटण तालुक्यामध्ये आंदळ दळतय आणि कूत्र पीठ खातय अशी परस्थिती का निर्माण झाली.? या कोरोनाचा नावाखाली सर्व सामान्य शेतकरी व आम जनता भरडली जात आहे. याचा विचार होणे गरजेचे आहे. असे मत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

विक्रमबाबा पुढे म्हणाले पाटण तालुक्यात एकही कोरोनाग्रस्त रुग्ण नसताना आतापर्यंत सगळे आदेशाचे पालन केले गेले आहे. तरीसुद्धा कंटेनमेंण झोन पाटण तालुक्यात टाकून लोकांच्यावर अन्याय केलेला आहे. खर वास्तविक कंटेनमेंट रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये अनेक चौरस कि.मी.क्षेत्रामध्ये ९५ टक्के क्षेत्र कमी केलेले असताना पाटण तालुक्यात नवीन कंटेनमेंट झोन टाकण्याची काय आवश्यकता हे आजी माजी मंत्र्यांनी व राज्य कर्त्यांनी योग्य भूमिका घेऊन प्रशासनाला जाब विचारायला हवा होता पण तसे काहीच होताना दिसत नाही. पाटण तालुक्यात नुकताच सलग दोनवेळा झालेल्या चक्री वादळ व मुसळधार पाऊसामुळे शेतकऱ्यांचे घर – बैलगोठे, आंबा काजू व इतर पिकांचे झालेल्या नूकसानीचे अद्यापही पंचनामे झालैले दिसून येत नाहीत. पाटण तालुक्यात आजरोजी प्रचंड पाणी टंचाई जाणवत असून तालुक्यातील जनता पाणी पाणी करून ठाहो फोडत आहे. आजी – माजी नामदार व लौकडाऊन मधे संबंधित शासकीय अधिकारी कौरोनटाईन सारखे झोपेचे सोंग घेऊन झोपलेले आहेत. असा आरोप ही विक्रमबाबा यांनी यावेळी केला.

२०१९ साली या तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी होऊन कोयना धरणातून मनमानी पध्दतीने पाण्याचा विसर्ग केल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेली. वीज पंप व विहीरी पाण्यामध्ये बुडाल्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पाणी शिरुन अनेकांचे लाखो रुपये नुकसान झाले. या बाबत आजी माजी लोकप्रतिनिधी बरोबर प्रशासन मुग गिळून गप्प आहे. अद्याप किती लोकांना व शेतकऱ्यांना राज्य शासनाने आर्थिक मदत केली. या बाबत खुलासा होणे गरजेचं आहे. तसेच किती शेतकऱ्यांची कर्जमाफी व त्यांचे पुनर्रघठन केले या बाबत जिल्हा मध्यवर्ती व इतर राष्ट्रीय बैंकांनी शेतकऱ्यांना कीती व कोणती मदत केली. जर केली नसेल तर यांना जाब कोण विचारणार.? पावसाळा तोंडावर आलेला असून. रब्बीची पूर्व मशागतीचे कामे सुरुवात झाली आहेत. अशा परस्थितीत शेतकऱ्यांना टैक्टर मधे डिजेल मिळत नाही. त्यांना बी. बियाणे खते औषधे उपलब्ध होत नाहीत. चक्री वादळाने उडून गेलेल्या घरांदारांसाठी दुरुस्ती साहित्य उपलब्ध होत नाही. एंकदरीत कोरोनाच्या रोगाशी लढा देऊयात सामान्य माणसांच्या भावनेशी व परस्थितीशी चेष्टा करु नका. अन्यथा या सुलतानी राजवटीच्या विरोधात जनता बंडाच निशाण हातामध्ये घेऊन ईतिहास प्रस्थापित करेल. असा इशारा विक्रमबाबा पाटणकर यांनी शेवटी दिला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular