(अजित जगताप)
सातारा दिनांक गेले दोन आठवडे कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालेले आहे. ग्रामीण भागातील अवस्था अत्यंत बिकट झाली असून स्वच्छतेबाबत दुर्लक्षितपणामुळे साथीचे रोग व रोगराई पसरले आहे यावर काही अंश बात करण्यासाठी शनिवारी दि: २७ जुलै रोजी सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत मध्ये महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानासाठी सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीच पुढाकार घेतलेला आहे .
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत व वाड्या वस्तीमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यत आले होते . त्यानंतर राजकीय ईस्कूड झाल्यामुळे संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम थंडावली होती. त्याचा परिणाम म्हणून पावसाळ्यातील जलजन्य व साथरोग फोफावली आहेत. सरकारी व खाजगी दवाखान्यात सुद्धा रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे अखेर सातारा जिल्हा परिषदेच्या कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनीच महास्वच्छता अभियानासाठी पुढाकार घेतला. शनिवार दि.२७ जुलै २०२४ रोजी जिल्हयातील सर्व गावांमध्ये “महास्वच्छता अभियान” राबवणे येणार आहे . सातारा जिल्ह्यात डेगूंची संख्या वाढू लागली आहे. अनेकांना सर्दी, पडसं, जुलाब डोकेदुखी, अंगदुखी असे आजार होऊ लागल्याने दक्षतेचे उपाययोजना सुरू केलेली आहे. पिण्याचे पाणी स्वच्छ असले तरी सध्या वाढत्या पावसामुळे अनेक सार्वजनिक विहिरीमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. माती मिश्रित पाणी जलशुद्धीकरण झाल्यानंतरही पाणी पूर्ण शुद्ध होणे अशक्य झालेले आहे. उघड्यावरील गटार, सांडपाणी याच्यामुळे सुद्धा मच्छर, डास , माश्या, मुंग्या वाढू लागल्याने स्वच्छते शिवाय पर्याय राहिलेला नाही.
यासाठी जिल्हयातील सर्व गावांमध्ये दिनांक २७ जुलै २०२४ रोजी सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत ग्रामपंचायत हद्दीत महास्वच्छता अभियान” राबविणेत येणार आहे. या मोहिमेत ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला, बचत गट प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, युवक, सार्वजनिक उत्सव मंडळ, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग व विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे घेण्यात येणार आहे.
गावातील ग्रामपंचायत इमारत, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, शासकीय कार्यालय स्वच्छ होणार आहे. सार्वजनिक पाणी पुरवठा स्तोत्रांची स्वच्छता व दुरुस्ती करणेत येणार आहे.
टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावून पाणी साचू नये .यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. फॉगिंग मशीनद्वारे तसेच तन नाशक फवारणी केली जाणार आहे.
तसेच आवश्यकतेनुसार सार्वजनिक ठिकाणी तणनाशकाची फवारणी करणेत येणार आहे.
जलजन्य व साथरोग आजार व औषधोपचाराबाबत गृहभेटी व जनजागृती करणेत येणार आहे.
महास्वच्छता अभियान उपक्रमासाठी झाडू, कचराकुंड्या, थैल्या, हातमोजे, मास्क, सॅनिटायझर, फावडे, घमेली इ. साहित्य व घंटागाडी उपलब्ध करणेत याव्यात तसेच गोळा होणाऱ्या कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावणेत यावी. गोळा झालेला कचरा इतरत्र
पडणार/विस्कटला जाणार नाही याची दक्षता घेणेत यावी अशा सुचनाही सातारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत. त्याचे काटेकोरपणाने पालन करताना सिंगल युज प्लास्टिक विक्री व वापर करणाऱ्या दुकानदारावर दंडात्मक कारवाई व्हावी अशी सूचना दिलेली आहे गावपातळीवर व्हॅट्स अँप ग्रुप . दवंडी व नोटीस देऊन गावामध्ये सर्व दर्शनी भागात फलक लावून महा स्वच्छता अभियानाची प्रसिद्धी व जनजागृती करावी. महा स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेतील याप्रमाणे सर्व तालुक्यांनी नियोजन करावे अशी सूचना सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी दिली आहे.
————————————
फोटो सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन
सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतीत शनिवारी दि.२७ रोजी महास्वच्छता अभियान…..
RELATED ARTICLES