Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्वरमधील कडाक्याच्या थंडीने स्ट्राँबेरीसह इतर पिकांचे लाखोंचे नुकसान

महाबळेश्वरमधील कडाक्याच्या थंडीने स्ट्राँबेरीसह इतर पिकांचे लाखोंचे नुकसान

महाबळेश्वर : महाबळेश्वरचा प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरात शनिवारी झालेल्या प्रचंड हिमकण व कडाक्याच्या थंडीमुळे शेकडो पर्यटक व स्थानिकांनी भेटी देवून कौतुक केले तसेच त्याचे चित्रण ही केले, फोटो काढले व प्रसिद्धी देत व्हाव्हा मिळविली त्याच या भागातील मळेधारक शेतकरी तसेच नर्सरीच्या बागा करणार्‍या मळेधारकांच्या या आचान्काच्या नौसार्गिक आपत्तीमुळे तोंडचे पाणीच पाळले असून त्याच्याकुटुंबावर शोककळा पसरली आहे. तर तोडण्यासाठी तयार झालेली शेकडो किलो स्टोबेरी ची फळे, हातातोंडाला आलेले बटाटा पिक, वांगी फराशी, गेले आठवडाभर थंडीने संपूर्ण देशावर अधिराज्य केले होते त्याचाच परिणाम महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वरमध्ये ही पहावयास मिळत होता. हे पर्यटनस्थळ ही आठवडाभर थंडीने गारठले होते. मात्र ह्या शुक्रवार – शनिवारी त्याने कहरच केला.
महाबळेश्वर परिसरात अचानक थंडीचा जोर वाढला आणि त्याने विक्रमच केला. येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील निच्याकी तापमान 0 ते उणे 2 पर्यंत गेले होते. पडलेल्या थंडीचा प्रचंड कडका व त्यामुळे तयार झालेले या हंगामातील सर्वात जात हिमकण यामुळे येथील प्रसिध्द वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील निच्याकी तापमान 0 ते उणे 2 पर्यंत गेले होते. यामुळे याच परिसरातील स्टोबेरी मळेधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्याने अक्षरशः हजारो किलो स्टोबेरीची फळे फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली असून त्यांच्या कुटुंबांवर दुखाचे सावट पसरले आहे. हीच परिस्थिती पाले भाज्या व फुल शेती करणार्‍या शेतकर्‍यांची असून सर्व रोपे प्रचंड थंडीने जळल्याने त्यांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी आम्हाला शासनाकडून त्वरित मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
महाबळेश्वर म्हटले की, स्टोबेरीची मधुर फळे हे समीकरण असून दररोज या भागातून कित्येक तन स्टोबेरी बाहेर भागात पाठविली जाते तसे स्तोबेरीचे फळ लाल चुटूक, मनमोहक, मधुर पण नाजूक असते. कालच्या येथील अचानकच्या कडक्यामुळे येथील प्रसिद्ध वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरासह तालुक्यातील बर्याच भागातील स्तोबेरीच्या फळांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वरून ही फळे मोठी दिसत असली तरी आत मात्र ती पूर्णपणे नासल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे मळेधारक ती पर्यटकांना देवू शकत नाहीत ना ते ती सरबत, ज्यूस साठी वापरू शकत नाहीत.कारण ती रोगिष्ट व बे चव झाली आहेत. यामुळे त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून मळेधारकांनी अक्षरशः शेकडो किलो स्टोबेरी कचर्‍यात फेकून दिली.
निसर्गाच्या या लहरी पणामुळे सध्या या भागातील मळेधारक हवालदिल झाला असून ऐन हाता तोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोक कालच पसरली आहे .कालच्या काद्क्या नंतर आज हे मळे धारक स्टोबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले आश्रू आवरता आले नाहीत. एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले मात्र आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची पाळी आली. याहून आमचे दुर्भाग्य ते काय? अशी व्यथा अनेक मळेधारकांनी पत्रकारांकडे व्यक्त केली. शासन अन्य पिकांना नुकसान भरपाई देते आमचे या फळांवरच जीवन असल्याने शासनाने खास बाब म्हणून आमचा सहानुभूती पूर्वक विचार करून तातडीची मदत करावी अन्यथा आमच्या कुटुंबीयांवर उपास मारीची पाली येण्याच धोका आहे. कारण थंडीमुळे हा संपूर्ण तोड वाया गेला आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा 1 ते 1.5 महिने थांबावे लागणार शिवाय एप्रिल – मे महिन्यात काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. तेव्हा शासनाने आम्हा मळेधारकांना मदत करावी. अशीच परिस्थिती याच परिसरातील अन्य फळ -पाले भाज्या करणार्‍या शेतकर्‍यांची तसेच परिसरातील शोभिवंत फुल झाडांची शेती करणार्‍या मळेधारकांची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी) झाडे, जांभूळ झाडे, पेरूची झाडे थंडीमुळे जळून गेली आहेत.ती पूर्णपणे काळी पडली आहेत.
वांगी, बटाटा, फारशी मिरची, कोबी, फ्लावर आदीची रोपेही जाळून गेली आहेत त्यामुळे या मळे धारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच काळ ज्या झेंडू, गुलाब, जरबेरीया, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांनी हिमकणांचे दागिने घातले होते व त्याचे सर्वत्र कौतुक होत होते. त्याच फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी व गंभीर झाली आहे. कडक्या मुळे सर्व रोपे जळून गेले असून फुलांकडे तर बघवत नाही. या नर्सरीवाल्यांचेही लाखोंचे नुकसान झाले असून ते ही चिंतेत आहेत. शासनाने या बाबींचा गांभीर्याने विचार करून महाबळेश्वरच्या या हवालदिल झालेल्या शेतकरी कुटुंबांना खास बाब म्हणून मदत करावी अन्यथा त्याचे जगणे कठीण होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular