सातारा: जागतिक पातळीवर आनंददायी असणार्या देशांची यादी जाहीर झाली आहे.त्यामध्ये भारताचा 140 वा क्रमांक लागतो.तेव्हा जी भयावह परिस्थिती आहे.त्यास मुठमाती देण्यासाठी छ. शाहु, शिवराय,संभाजी,डॉ.आंबेडकर, म.फुले- कबीर,बुद्ध अश्या महापुरुषांचे विचार आत्मसात केले तरच खर्या अर्थाने भयमुक्त सर्वांगसुंदर समाज निर्माण होईल.असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते विशाल कांबळे यांनी केले.
छ.शाहु महाराज यांची 145 वी जयंती येथील पंचशील प्रसारक मंडळातर्फे जेतवन बुद्धविहारमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तेव्हा विशाल कांबळे मार्गदर्शन करीत होते.अध्यक्षस्थानी लुम्बिनीचे सर्वेसर्वा डॉ.प्रा.गोरख बनसोडे होते.यावेळी बंधुत्व प्रतिष्टानचे संस्थापक अनिल वीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विशाल कांबळे म्हणाले,छ. शाहुनी दूरदृष्टीने आरक्षणाची अंमलबजावणी केली.त्यांच्या आर्थिक मदतीमुळेच डॉ.आंबेडकर निर्माण झाले.याशिवाय,बंधुत्वाचे नातेही त्यांनी जोडले.ज्ञानाचे राजे म्हणनुही छ.महाराजानी डॉ.आंबेडकरांना संबोधले.यामधून विशालदृष्टिकोन पाहायला मिळत आहे.तेव्हा समाजातील सर्व घटकांनी संकुचित भावना बाळगु नये.मन जिंकणारा जग जिंकेल,तेव्हा स्वार्थ हेतूने कार्य करू नये.कारण,स्वार्थपणा झोपुही देत नाही.नैतिकतेची भावना अखंडतेने आयुष्यभर जतन करावी.कांबळे यांनी छ. शाहु महाराजासह इतर महापुरुषांचे विविध दाखले देत खर्या अर्थाने प्रकाशझोत टाकला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.प्रा.गोरख बनसोडे म्हणाले,शाहु महाराज व डॉ.आंबेडकर यांची पहिली भेट माणगाव येथे झाली.तेव्हापासून विश्वासाहर्ता निर्माण झाली.बाबासाहेबाना उभे करण्यात सिहाचा वाटा त्यांचाच होता. यावेळी जालिंदर मस्केसह अनेकांनी मनोगत व्यक्त केली.प्रथमतः छ. शाहु महाराज यांच्या प्रतिमेस अनिल वीर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.दिपप्रज्वलन विशाल कांबळे व डॉ.बनसोडे यांनी केले.
स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.रमेश मस्के यांनी केले.पंचशील प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संकेत मस्के यांनी आभारप्रदर्शन केले. सदरच्या कार्यक्रमास बिटाईंड आईज इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म-फेस्टिवलचे प्रणेते तुषार बोकेफोडे,योगेश मस्के,रणजित मस्के,प्रतीक मस्के,आयुष मस्के,सिद्धेश मस्के,हृतिक मस्के, अभिजित मस्के,सुबोध मस्के,प्रशांत मस्के,विविध क्षेत्रातील मान्यवर,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होत्या.
महापुरुषांचे विचारच भयमुक्त होण्यास सहाय्यभूत ठरतीलःविशाल कांबळे
RELATED ARTICLES