म्हसवड : थंडीचा कडाका वाढल्याने येथील माण देशी फौंडेशन चारा छावणीत आपल्या जनावरांसोबत वास्तव्यास आलेल्या शेकडो महिला शेतकर्यांना संस्थेच्या वतीने मोफत उबदार ब्ल्यांकेट वाटप करण्यात आले.
दुपारी उन्हाचा चटका व रात्री कडाक्याची थंडी अशा वातावरणात चारा छावणीतील शेतकरी भरडला जात असताना माणदेशी चॅम्पियनचे अध्यक्ष प्रभात सिन्हा यांच्या हस्ते सुमरो 300 शेतकर्यांना उबदार ब्ल्यांकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, रवी विरकर, विजय कोळपे आदी मान्यवर उपस्थित होते.
निसर्गाच्या अवकृपाने पुन्हा छावणी सुरु करावी लागली हे खर पण छावणीतील बळीराजा जनावरां सोबत विक्षिप्त वातावरणात थंडीने गारठू लागल्याचे मुंबई महोस्तव मध्ये प्रभात सिन्हा यांना समजलं व त्यांनी सर्व शेतकर्यांना उबदार ब्ल्यांकेटें वाटप करण्याचे ठरविले आणि मुंबई हून परत येताच सुमारे तीनशे शेतकर्यांना ब्ल्यांकेटचे वाटप केले. बळीराजा जरी थंडीने गारठला तरी माण देशीच्या उबदार ब्ल्यांकेटने सुखावला. शेतकर्यावर निसर्गाने जरी अवकृपा दखविली असली तरी माण देशी सदैव त्यांच्या सोबत राहणार असल्याचे ही यावेळी बोलताना प्रभात सिन्हा म्हणाले.
माणदेशीने गत वेळच्या छावणी समाप्ती वेळी भविष्यात पुन्हा अशी वेळ येवू नये यासाठी संकल्प केला होता. त्यासाठी एकूण तेरा बंधारे ठिकठिकाणी बांधले. परंतु यंदा कसलाच पाऊस न झाल्याने नद्या नाले ओस पडले बंधारे सुद्धा कोरडे पडले. शासन स्तरावरून हि माण तालुक्यात दुष्काळ जाहीर केला गेला. त्यामुळे राज्यात पहिली चारा छावणी मेगा सिटी म्हसवड मध्ये सुरु करावी लागल्याच विजय सिन्हा म्हणाले.
चारा छावणीतील शेतकर्यांना ब्लँकेट वाटप
RELATED ARTICLES