वाईः संपुर्ण राज्यात दुष्काळाची दाहकता व भीषणता दिवसेंनदिवस वाढत चालली आहे. दुश्काळी पटट्यात न येणार्या परिसरात ही पाण्याचे स्त्रोत आटले असून पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने मर्यादीत राहीलेले जलस्त्रोतही संपण्याच्या मार्गावर आहेत. माणसाला तसेच पशु-पक्षी यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. जमीनीत कोणत्याही प्रकारचा ओलावा राहीलेला नाही. यामुळे शिवारात तसेच डोंगरात, माळावर वर असणार्या लहान-सहान रोपटयांनाही जीवंत राहण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणून की काय शेतकरी तसेच विघ्नसंतोशी लोकांमुळे खाजगी शेतीच्या व पडीक रानात तसेच वनविभागाच्या डोंगरात सर्रास वणवा लावणारांची मुजोरी वाढत चालली असून दोषींनी कोठेही दंड अथवा कडक शासन होताना दिसत नसल्याने पर्यावरणप्रेमी हतबल असून त्यांच्यात संतापाची लाट उसळली आहे.
या आसमानी संकटाला तोंड देण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून विविध ठिकाणी पर्यावरणप्रेमी पक्षांना तसेच झांडाना आप-आपल्या परिने पाणी देण्याचे काम नोकरदार, व्यवसायिक , पर्यावरण प्रेमी करताना दिसत आहेत. वाई-पसरणी घाटात, सोनजाईच्या डोंगरात,या परिसरात अनेक लागण केलेल्या रोंपटयांना पाणी घालण्याचे काम करीत आहेत. तसेच विविध ठिकाणी पक्षासाठी वॉटरबँंक केल्याच्या दिसत आहेत. यामुळे ऐन उन्हाच्या तीव्रतेतही झांडांना तसेच पक्षांना दिलासा मिळाला आहे. सोनजाईच्या डोंगरात दर रविवारी वृक्षसंवर्धन गु्रपचे सदस्य जात असतात जाताना पाण्याचे कॅन भरून आणून सोनजाईच्या देवीला जाताना डोंगराततील रस्त्याच्या कडेला अनेक झाडे लावली आहेत. तसेच पक्षांसाठी पाण्यांची भांडी लावली आहेत त्यामध्ये पाणी भरण्याचे काम करीत आहेत. तसेच झांडाना पाणी घालत आहेत.
लहानग्या रोपटयांना व पक्षांना वाचवितोय माणूसकीचा पाणी रूपी झरा
RELATED ARTICLES