Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमराठा - बहुजन क्रांती सामाजिक ऐक्याची बैठक यशस्वी ; पहिल्याच बैठकीत चार...

मराठा – बहुजन क्रांती सामाजिक ऐक्याची बैठक यशस्वी ; पहिल्याच बैठकीत चार वादांचा निपटारा.

पाटण :- जगाला शांततेचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्ध पोर्णिमा जयंती दिवशी पाटण येथे नव्या क्रांती ला सुरुवात करून मराठा – बहुजन क्रांती सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला होता. या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन पाटण येथे मराठा – बहुजन क्रांती मोर्चा समन्वयकांची पहिली बैठक झाली असताना या बैठकीत मराठा – बहुजन क्रांती सामाजिक ऐक्य समिती स्थापन करण्यात आली. व पहिल्याच बैठकीत सामाजिक वाद असलेल्या चार वादांचा निपटारा करण्यास या समितीला यश आले. ऐट्रासिटी कायद्याचा होणारा गैरवापर या समिती कडून टाळला जाणार असुन जातीय वाद होणार नाही. यासाठी हि समिती समाज प्रबोधन करणार आहे. तसेच सर्व समाजात सामाजिक सलोखा निर्माण करण्याचा या समितीचा प्रयत्न राहणार असुन. पाटण तालुक्यातील सर्व विभागात या समितीची उप समिती स्थापन करण्यात येणार आहेत. सामाजिक सलोखा बिघडवून कोणताही वाद निर्माण झाल्यास मराठा – बहुजन क्रांती सामाजिक ऐक्य समितीस संपर्क करण्याचे अहवान हि या बैठकीत करण्यात आले आहे.

ऐट्रासिटी गुन्ह्यांचा आतापर्यंतचा अभ्यास केला तर हे वाद राजकीय द्वेशातून, जमिनीच्या वादातून, अथिॅक व्यवहारातून आदी इतर वादातून ऐट्रासिटी कायद्याचा दुरुपयोग होत असल्याचे समोर आले असून ऐट्रासिटी चे जास्तीचे वाद हे राजकीय व्देषातुनच आहेत. असे पोलिसांच्यां अहवालातुन समोर येत आहे. सर्व समाजामध्ये जातीय सलोखा राखणे तसेच सामाजिक शांतता प्रस्थापित करणे. हे या समितीचे कार्य आहे.

पाटण तालुका डोंगर-दुर्गम असुन तालुक्याच्या प्रत्येक गावात सर्व समाज गुण्यागोविंदाने एकत्र राहत आहे. काही ठिकाणी अपवाद वगळता किरकोळ कारणावरून सामाजिक तेढ व वाद निर्माण होतात. असे काही वाद ऐट्रासिटी सारखा गुन्हा दाखल होण्यास हि भाग पडतात. अनेक वेळा अशा वादापाठीमागे राजकीय अथवा गावगुंड समाज कंठक आपल्या स्वार्थाची पोळी बाजून घेताना दिसतात. आणि दोन्ही समाजात जातीय वाद घडवून आणतात. हा प्रकार सामाजिक ऐक्य बिघडविण्याच्या द्रुष्टीने केला जातो. अशा समाज कंठकांना बाजूला सारून सर्व समाज्यात ऐकोपा राहण्याच्या द्रुष्टीने “मराठा – बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक ऐक्य समिती” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही कारणास्तव कुठे जातीय वाद निर्माण झाल्यास हा वाद प्रथम सामाजिक ऐक्य समिती समोर आणला जाणार आहे. कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेऊन समिती मार्फत या वादाची शहानिशा करून ऐकोपाने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र विनाकारण कोणी वाद घडवून आणून समोरच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केल्यास असा अन्याय हि समिती खपवून घेणार नाही. अशा वेळी हि समिती ज्याच्यावर अन्याय झालाय त्याच्या बाजूने उभी राहून त्याला कायदेशीर बाबीने मदत करेल. मग तो कोणत्याही समाजाचा असो. असा ठाम निर्णय सर्वानुमते या बैठकीत घेण्यात आला आहे.

यावेळी बोलताना अॅड. अविनाश जानुगडे, म्हणाले अनेक अमिषे दाखवून, दबाव निर्माण करुन असे गुन्हे घडवले जात आहेत. ॲट्रासिटीसारखे गुन्हे न घडण्यासाठी समाज प्रबोधनाची खरी गरज आहे, सामाजिक ऐक्याची भुमिका चांगली आहे, सामाजिक ऐक्य समितीने आदर्शवत काम करून राज्यात पाटण पॅटर्न म्हणून नाव लौकिक करावे. सामाजिक ऐक्य समितीला गुन्हयांच्या सोडवणुकीसाठी पाटण वकील बार असोसिएशन कडून कायदेशीर मार्गदर्शन केले जाईल. समितीच्या माध्यमातून निपक्षपाती काम झाले पाहिजे. पाटण तालुक्यातील हा चांगला उपक्रम इतर तालुक्यात व राज्यात आदर्शवत ठरावा. यावेळी प्रा. रविंद्र सोनावले यांनी समितीच्या स्थापनेचा व कार्याचा उद्देश सांगितला, नितीन पिसाळ, दिनकर माथणे, अनिल मोहिते, अॅड.संदीप कांबळे, अनिल वीर, शंकर मोहित, अनिल माने, शुभम उभाळे यांनी समितीने निपक्षपातीपणे तालूक्यात काम करून सामाजिक सलोखा राखावा, सामाजिक कार्यकर्ते, समाज सेवकांनी पुढे येऊन सामाजिक बांधिलकी जोपासत समितीच्या कामातून राज्यात आदर्शवत काम करण्याचे आवाहन केले. या बैठकीस यशवंतराव जगताप, जयवंत सुवेॅ, गणेश मोरे, राजेंद्र घारे, राजेंद्र पाटणकर, यशवंत दाभाडे, झिमरे गुरूजी, संजय कांबळे, मंगेश पाटणकर, सागर जाधव, दिनकर वाईकर, गणेश जाधव, सुभाष शिर्के,दिपक मांडावकर यांच्यासह मराठा -बहुजन क्रांती मोर्चा पाटण तालुका समन्वयक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा – बहुजन क्रांती मोर्चा सामाजिक ऐक्य समितीच्या पहिल्याच बैठकीत पाटण तालुक्यातील चार वादांचा निपठारा करण्यात आला. यामध्ये पाटण येथील दुकान गळ्याच्या जागेवरून विकोपाला गेलेला वाद सांमजषाने मिठवूण दोन्ही बाजूकडील लोकांना न्याय देण्यात आला. चाफळ विभागातील पाटवडे येथील ऐट्रासिटी चा वाद समितीच्या माध्यमातून मिटला असून तो ज्ञायालयात देखील समजोत्याने मिटवला जाणार आहे. साखरी, नवारस्ता, दिवशी येथील लोकांनी आपली तक्रार या बैठकीत मांडली असता दोन्ही बाजुंकडील लोकांचे बाजू समजून घेऊन वाद मिटविण्याचे एकुण ठरले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular