म्हसवड : गोंदवले खुर्द येतील ग्रामीण रुग्णालत वैद्यकीय अधिकार्यांच्या अनुपस्थितीमुळे आरोग्य सेवा पूर्णता विस्कळीत झाली असून गेले 21 दिवस हा गंभीर प्रकार रुग्णालयात सुरू आहे.केवळ कर्मचार्यांच्या जीवावर हे रुग्णालया सुरू आहे.मात्र वरिष्ठ पातळीवर ही बाब गांभीर्याने घेतली जात नाही यामुळे लवकरच गोंदवलेकर ग्रामस्थ याबाबत खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना भेटणार असून या बाबत निवेदन देणार असल्याचे साहेबराव शेडगे यांनी सांगितले.
गोंदवले खुर्द ता माण येते ग्रामीण रुग्णालयात या ठिकाणी एक वैद्यकीय अधीक्षक आणि चार वैद्यकीय अधिकारी अशी पदांची रचना आहे मात्र एक वैद्यकीय अधिकारी हे पद केवळ कार्यरत असून बाकिची पदे फक्त नावाला आहेत येते कार्यरत असणारे डॉ के पी कदम हे वैद्यकीय अधिकारी अधिकृतपणे वैद्यकीय रजेवर गेले असून त्यांच्या ठिकाणी दुसर्या डॉक्टरांची नेमणूक तात्काळ होणे गरजेचे होते मात्र इथे कोण ही डॉक्टर उपलब्ध झाले नाहीत त्यानंतर कराड येतील एका वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली त्यांनी ही दोन तीन वेळा हजर राहत पुन्हा या आदेशाला कोलदंडा दाखवत इकडे न येणे पसंत केले त्यानंतर रुग्णाची फार गैरसोय होतेय म्हणून अन्य एका डॉक्टरांची नेमणूक केली ती ही 21 दिवसांनी असा प्रकार सुरू असून वर कधी ही विचार केला गेला नाही या ठिकाणी गेल्या आठ वर्षपूर्वी डॉ लादे हे पूर्ण वेळ वैद्यकीय अधिक्षक म्हणून कार्यरत होते त्यांच्या नंतर मात्र एकदाही पूर्ण वेळ अधिकारी मिळाले नाहीत आज पर्यत वरिष्ठांनी केवळ वैद्यकीय अधिकार्यांच्या कडे अधिभार सोपवून स्वता रिकामे होत आहेत. रुग्णसेवे बद्दल कुणाला ही देणे घेणे नसून केवळ आपले कामाचे दिवस भरण्याचं काम सुरू आहे.
या रुग्णालया द्वारे परिसरातील गावाच्या लोकांना आरोग्य सेवा उपलब्ध होते.सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती असून गावोगावी चारा अन पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून सर्वसामान्य शेतकरी लोकांनी चार्यासाठी जनावरांना छावणीत दाखल केले आहे अनेक वेळा चारा घेऊन जनावरांना घालताना किंवा बारीक करताना हाताला पायाला लहान मोठ्या जखमा होत आहेत मात्र यासाठी उपचार घ्यायला रुग्णालयात आल्यावर इथे वैद्यकीय अधिकारी गैरहजर असतात परिणामी गावात कुठे आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने दुखणं अक्षरशः अंगावर काढण्याची वेळ या लोकांच्यावर येत आहे.गावात एवढ मोठं रुग्णालय असून सुध्दा रुग्णांना याचा लाभ घेता येत नाही.याठिकाणी गेल्यावर वैद्यकीय अधिकारी स्वता वैद्यकीय रजेवर गेले असून बाकीचे कर्मचारी उपस्थित असतात अनेक वेळा रुग्ण आल्यावर डॉक्टर नसल्याने याच कर्मचार्यांना किरकोळ उपचार आणि मलमपट्टी करून रुग्णाची समजूत काढावी लागते त्यानंतर डॉक्टरांना फोन करून बोलवलं जाते अशी इथली सिस्टिम आहे त्याच बरोबर वयाचे दाखले देण्याचे अधिकार फक्त ग्रामीण रुग्णालयात असून त्याही लोकांची गैरसोय होत आहे . यावर उपाय लवकर करण्यात यावा आणि पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी मिळावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून जर वैद्यकीय अधिकारी मिळाले नाहीत तर खासदार रणजितसिंह निंबाळकर याना निवेदन देण्यात येणार असल्याचे साहेबराव शेडगे यांनी सांगितले
डॉ श्री काटकर निवासी वैद्यकीय अधीक्षक सातारा
लोकांच्या भावना आम्ही समजू शकतो.आमच्याकडे पण डॉक्टरांची संख्या कमी असून तिकडे डॉक्टर द्यायचे कुठले असा आम्हाला प्रश्न पडला आहे.आम्ही तरी काय करणार असा प्रश्न त्यांनी केला.
वैद्यकीय अधिकार्यांची आहे रजा मात्र रुग्णाला मिळतेय सजा
RELATED ARTICLES