सातारा दि : अभिनेते इरफान खान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने सिने रसिक हळहळत आहेत. बेचाळीस वर्षापूर्वी वाई येथील रस्त्यावर ,,,रामजी की निकली सवारी,,,या गीताचे चित्रकरण झाले होते. त्या गाण्याची आठवण ताजी झाली आहे.
१९७८ च्या सप्टेंबरमध्ये वाई येथील चित्रा सिनेमा थिएटर ते किसन वीर चौक या मार्गावर सरगम या हिंदी चित्रपट चित्रीकरण करण्यासाठी ऋषी कपूर, जया प्रदा, असरानी व इतर कलावंत आले होते. रामजी की निकली सवारी,, रामजी की लिला है नायरी,,, या गीताच्या चित्रकरणा साठी ढोल ताशा, लेजिम खेळणाऱ्या ग्रामस्थांना दाखविण्यासाठी पाचगणी येथून वाईच्या किसन वीर महाविद्यालयात शिकणारी मुले विलास कांबळे -वहागावकर, चंद्रकांत कासुर्डे, विष्णू कंळभे,शिवाजी पवार, शेख मामु यांनी या गाण्यात लेझिम घेऊन नाचण्याची संधी मिळाली होती. या चार दिवसात अभिनेते ऋषी कपूर व इतर कलावंतांना जवळून पाहण्याचा योग्य लाभला होता.प्रत्येक दिवशी वीस रुपये मानधन व जेवण मिळत असल्याने वाई व पाचगणी परिसरातील लोक व मुलांना चांगलाच हातभार लागला होता.
सकाळी महाविद्यालयातील दोन पिरेड झाले की, काही मुले घाटावरील तंबूत एकत्र जमत होते. तिथे सर्वाची नावे लिहून ठेवली जात होती. तोंडाला मेकअप केल्यानंतर डोक्याला व कमेरला फडकं बांधून हातात लेझिम घ्यावी लागत होती.त्यानंतर रस्त्यावर चित्रीकरण करण्यासाठी रांगेत उभे राहिले की, देखणा ऋषी कपूर व जया प्रदा व इतर कलावंत आले की, दुपारी चार वाजेपर्यंत गाण्याचे चित्रकरण केले जात होते. चारी बाजूंनी कॅमेरा बसविण्यात आले होते. नाचताना ऋषी कपूर ला घाम आला की, एका बाजूला खुर्चीवर बसून शीतपेय पिल्यानंतर तो तयार होऊन पुन्हां चित्रीकरण करण्यासाठी येत होता.श्री रामाचा रथ व गुलालाची उधळण यामुळे पूर्ण जत्राच भरली असल्याचा भास होत असे. त्याच बरोबर डपली वाले, डपली बज्या,, या गीताचे ही चित्रीकरण पाचगणी येथे झाल्याची आठवण ऍड विलास वहागावकर यांनी करून दिली.
पाचगणी येथील बौद्ध वस्ती मध्ये मुकाबला सिनेमाचे चित्रीकरण झाले तेव्हा अभिनेते सुनील दत्त यांना पिण्यासाठी माठातील गार पाणी दिल्याचे ही सांगितले. या ठिकाणी गाव दाखविलं होते.””’इस गाव में डाकू को कोई ना कोई सामील होगा ” हा सुनील दत्त साहेब यांचा डायलॉग अजूनही लक्षात राहिला आहे. अशा अनेक आठवणी तसेच वाई ,पाचगणी येथील त्यावेळचा सुंदर व शांत परिसर चित्रपटात दिसत आहे. सध्या वाई म्हणा,, पाचगणी-महाबळेश्वर म्हणा,, अतिक्रमण व वृक्षतोड यामुळे गुदमरून गेला आहे. आता फक्त चित्रपट पाहताना त्याची आठवण ताजी होते. हेच मोठे समाधान लाभत आहे असे जुन्या पिढीतील ग्रामस्थांनी सांगितले. तसेच इरफान खान व ऋषी कपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.