सातारा : जावली तालुक्यातील अतिवृष्टीमुळे संपुर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे याची भरपाई मिळावी. या संदर्भातील पत्रकार परिषदेप्रसंगी आ. शिवेंद्रराजेपुढे म्हणाले सातारा व जावली हा डोंगराळ व दुर्गम भाग आहे. संपुर्ण जावली तालुका व सातारा तालुक्यातील पश्चिम भागात पावसाचे प्रमाण मोठे आहे. या वर्षी तर गेली दोन तीन महिने जोरदार पाऊस झाल्यामुळे घरांचे शाळांचे व शेतांचे बांध यांच्या पडझडी बरोबर शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. सातारा जावली तालुक्यातील ग्रामीण भाग हा डोंगराळ असल्याने या ठिकाणी प्रामुख्याने भात ,नाचनी, भुईमुग ,हायब्रिड ज्वारी, वरी ,कारळा या पिकां बरोबर भाजी पाल्यांची लागवत मोठ्या प्रमाणात केली जाते सतत कोसळऱ्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने शेतकरी वर्गाचे फार मोठ्या प्रमाणात आर्थीक नुकसान झाले आहे. संपुर्ण पिके सडली आहेत, तरी सातारा व जावली तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला शासनाकडून तातडीने नुकसान भरपाई मिळाणे अत्यंत महत्वाचे असल्याने अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचा पहाणी अहवाल शासनास सादर करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडोब भरपाई मिळावी यासाठी मी मुंबईला जावून याचा पाठपुरावा करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून काही मदत देता येते की यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असे सांगण्यात आले . या पत्रकार परिषदेमध्ये सातारा पंचायत समिती मेढा पंचायत समिती सभापती उपसभापती सरपंच उपसरपंच कार्यकर्ते उपस्थित होते..
(छाया….. संजय कारंडे )