अजित जगताप
सातारा दि : कोरेगाव विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्या पेक्षा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जिव्हारी लागला होता. त्याच वेळी शिंदे यांच्या राजकीय पुनर्वसनाची अटकळ बांधली जात होती. ती अखेर खरी झाली असून कोरेगावात सेना -काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत मंडळी खुश झाले आहेत.
राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेकांनी पक्ष बदलले.काहींना पराभव तर काहींच्या निसटता विजय झाला होता. सातारा जिल्ह्यातील विधानसभेच्या निवडणुकीत कोरेगाव मतदारसंघात माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना पक्ष व पक्षाबाहेरील व्यक्तीद्वेष व गद्दारी व काही कार्यकर्त्यांचा अतिउत्साही पणा नडला होता. त्यातच छत्रपती शिवराय यांच्या घराण्यातील वजनदार नेते श्री छ उदयनराजे भोसले व आ शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्याने त्यांची मताधिक्याची रसद मिळू शकली नाही. या सर्वांचे समीकरण म्हणून शिशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला होता. मुळातच लढाऊ शिंदे यांनी त्यानंतर ही सातारा जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी संपर्क ठेवला. त्याचे फळ त्यांना विधान परिषद सदस्य म्हणून मिळाले आहे. जावळी मध्ये १९९९,२००४ दोन वेळा आमदार झाल्यानंतर ते २००९ साली तिसऱ्या वेळी जावळी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार होऊ शकत होते.पण, स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले यांनी केलेल्या राजकीय उपकाराची परतफेड म्हणून सातारा -जावळी मतदारसंघात आ .शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना संधी देऊन शिंदे हे मतदार नसलेल्या कोरेगाव मतदारसंघात उभे राहून निवडून आले होते. त्याठिकाणी माजी मंत्री व वजनदार नेत्या श्रीमती शालिनीताई पाटील यांचा पराभव करून त्यांनी त्यांचे राजकीय कारकीर्द विजनवासात पाठवली. दुसऱ्या वेळी आमदार होऊन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड सुरु असताना कोरेगाव मतदारसंघात शिंदे यांना पराभव स्वीकारावा लागला होता. तसेच खासदरकीला उदयनराजे भोसले यांनी राजीनामा देऊन भाजप तिकिटावर नशीब अजमावले पण, त्यांचा ही पराभव झाला असला तरी आता दोन्ही ही बड्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. हे शुभ संकेत मानले जात आहेत. आता संसद व विधान भवनात सातारकरांची गर्दी वाढणार आहे.
कोरेगाव मतदारसंघात सेनेचे आ .महेश शिंदे हे तडफेने काम करीत असले तरी त्यांनी भाजप शी नाळ जपली आहे. त्यामानाने शिवसैनिक त्यांच्या सोबत दिसत नाहीत. अशी कोरेगाव मतदारसंघात चर्चा होतच असते. आता केंद्रात भाजप चे आणि महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यामुळे कोरेगाव मतदारसंघात विकास कामांचा पल्ला गाठण्यासाठी खासदार व आमदारकीचे डबल इंजिन लागले आहे. त्याचा निश्चितच फायदा होईल असे सर्व सामान्य कोरेगावकरांना वाटू लागल्याने आ. शशिकांत शिंदे यांनी विधान परिषदेत प्रवेश केल्याने सेना -काँग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षांमध्ये खुशीचे वातावरण आहे असे सेनेचे रमेश बोराटे, काँग्रेसचे डॉ सुरेश जाधव, राष्ट्रवादीचे प्रदीप विधाते ,बाळासाहेब फाळके यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकट दूर झाल्यानंतर सातारा जिल्हात विकासाची रेल्वे
पुन्हा पटरीवर धावेल असे भाकित वर्तव्यन्यात येत आहे.
कोरेगावात शिंदेंच्या आमदारकीने सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे निष्ठावंत खुश….
RELATED ARTICLES