कराड : सातारा जिल्ह्यातील तरुण पिढीला बेरोजगारीतून सोडवण्यासाठी एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना प्रधानमंत्रभ नरेंद्र मोदी यांनी निर्माण केली आहे. ती म्हणजे मुद्रा बँक योजना होय. या योजनेतून ही कोणतेही आनुषंगिक तारण आथवा जामीनदार शिवाय होतकरू बेरोजगार तरुणांना कर्ज पुरवठा केला जात आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठभ हीयोजना प्रभावी आहे, असे मत मुद्रा बँक समन्वय समितीचे अशासकीय सदस्य सुदर्शन पाटसकर यांनी व्यक्त केले.
कराड येथे मुद्रा बँक योजनेसंदर्भात माहिती देण्यासाठी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते यास जिल्हा नियोजन अधिकारी बी.जी. जगदाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे नितीराज साबळे, जिल्हा सहायय्क गवळी साहेब, अशासकीय सदस्य संतोष मिसाळ, श्रीकांत साबळे, सुरज जिरंगे, कल्पेश पावसकर, फारूक सय्यद, तानाजी देशमुख, प्रकाश शेवाळ, आनंदराव जगताप, मोहन पुरोहिते, अभिजित म्हत्रे, सागर लाखे, महमद शेख, विष्णू पाटसकर, शशिकांत घोडके आदींची उपस्थिती होती.
यावेळी जिल्ह्यातील 404 कोटी 4 लाख कर्जाचे यावेळी वितरण करण्यात आले. यावेळी 467 कोटी इतक्या कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. तर जनधन योजना, विमा योजना, अश अनेक योजनांची माहिती देण्यात आली.
यावेळी संवाद मेळाव्यास कोरेगाव, वाई, कजहाड, पाटण आदी ठिकाणाहून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळभ जिल्हयात मुद्रा बँक योजनेविषयी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या शंकेचे अधिकार्यांनी निरसन केले.
बेरोजगारी दूर करण्यासाठी मुद्रा बँक योजना प्रभावी
RELATED ARTICLES

