वडूज: करपेवाडी ता.पाटण येथील भाग्यश्री संतोष माने हिच्या मारेकर्यांना अटक करावी या मागणीसाठी उद्या शुक्रवार दि. 1 रोजी संपूर्ण सातारा जिल्हा बंद ठेवण्यात येणार आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी शहरातून मूक मोर्चा काढला.
भाग्यश्री माने हिच्या मारेकर्यांना पोलीसांनी तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यातील नाभिक समाज बांधवांतून होत आहे.
संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी नाभिक समाज संघटनेच्यावतीने शुक्रवारी दि. 1 रोजी सातारा जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर खटाव तालुक्यातील नाभिक समाज बांधवांनी आज शहरातून मूक मोर्चा काढला. येथील हुतात्मा स्मारकात नाभिक समाज बांधवांची बैठक झाली.
प्रारंभी भाग्यश्री माने हिला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. उद्याच्या बंदमध्ये सर्व व्यवसायिकांनी सहभागी होण्याचे आवाहन नाभिक समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्हा बंदसाठी वडूजमध्ये नाभिक समाज बांधवांचा मूक मोर्चा
RELATED ARTICLES