वाई : वाई तालुक्यातील मुख्य धरणांपैकी नागेवाडी हे धरण आहे. या धरणात पाव टीएमसी पाणी साठवले जाते. नागेवाडी धरणाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने वर्षभर धरणातून पाणी पुरवठा करताना पाटबंधारे खात्याला तारेवरची कसरत करावी लागत असते, नागेवाडीच्या धरणाच्या कालव्यातून शेवटचे आवर्तन न सोडल्यास उन्हाळ्यातील पिके वाया जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती.
आमदार पाटील यांनी नागेवाडी पाटबंधारे खात्याला शेवटचे आवर्तन सोडण्याचे आदेश दिल्याने बावधन सह बारा वाड्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. त्यामुळे बावधन परिसरातील शेतकर्यांना धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे, तसेच परिसरातील शेतकर्यांनी कालव्यावर येवून आनंद व्यक्त केला. बावधनसह बारा वाड्यांना शेती व पिण्याच्या पाण्यासाठी या धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्यातच नागेवाडी धरणाला तीन ते चार ठिकाणी लागलेली गळती काढण्याचे आदेश सुध्दा देण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे,ती गळती थांबणार आहे,लिकेजमुळे धरणात पाण्याचा खडखडाट झाला आहे. पाटबंधारे खात्याने योग्य नियोजन न केल्याने पाण्यात जे मत्स पालन केले जाते. ते योग्य पद्धतीने न केल्याने व पाणी वाहते नसल्याने पाण्याला दुर्गंधयुक्त वास येत आहे. आ. मकरंद पाटील यांच्या प्रयत्नातून धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्याचे काम पूर्ण झाले असून बावधनसह बारा वाड्यांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. तरीही पोट पाटाची कामे आजमितीला अपूर्णच आहेत. पोट पाटाची कामे पूर्ण झाल्यास संपूर्ण शेती ओलीता खाली येवू शकते. नागेवाडी धरणात होणारे मत्स्य पालन बंद करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ करीत आहेत. धरणाची पाणी संकलन करण्याची क्षमता कमी असल्याने ना शेतीला पाणी ना देवू शकत या बारमाही वाहते ठेवू शकत अशी काहीशी अडचण नागेवाडी धरणाबाबत आहे. धरणाची उंची वाढवून धरण क्षेत्र वाढविण्यासाठी पाटबंधारे खात्याने प्रयत्न करावा अशी मागणी जोर धरत आहे. बावधनसह बारा वाड्यातून हळद, उसाच्या पिकांबरोबर बागायती क्षेत्र बर्यापैकी असल्याने पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. ती आता शेवटचे आवर्तन सोडल्याने बर्यापैकी मिटली असून शेतकर्यांनी समाधान व्यक्त करीत पाटबंधारे खात्याला धन्यवाद दिले आहेत. लिकेज होणार्या पाण्यावर नागरिकांनी पाईप लावून वाया जाणारे पाणी शेतीकडे वळविले आहे.लिकेजमुळे शेवटचे आवर्तन न सोडल्यास गहू, उन्हाळ्यात घेण्यात येणारी भुईमुग, घास, व इतर बागायती पिके वाया जाण्याची भीती व्यक्त होत होती.त्यामुळे बारा वाड्यांचा शेतीचा व पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येवून पाणी टंचाईचा सामना करावा लागणार होता. धरणातील पाणी पिण्यायोग्य नसल्याने बारा वाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतिशय गंभीर बनला आहे. शेतीच्या पाण्याचा प्रश्न सध्या बिकट बनला असूनउन्हाळ्यात शेतीसह जनावरांचेपाण्याचा प्रश्न गंभीर बनणार आहे. जनावरांच्या चार्याचा प्रश्न शेतकर्यांना भेडसावत जनावरांचा सांभाळ करताना शेतकर्यांचा जीव मेटाकुटीस आला आहे. असे विदारक चित्र सध्या बावधन सह बारा वाड्यात दुर्दैवाने दिसत आहे. नियोजन करून संपूर्ण गळती काढून पुढील हंगामात धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होवो व कालव्यात पाणी सुरळीत चालू राहो एवढीच अपेक्षा स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.
नागेवाडी धरणातून शेवटचे आवर्तन सोडून बावधन सह बारा वाड्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी
RELATED ARTICLES