साताराःमहाराष्ट्र भूषण ती.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य अतुलनीय आहे. त्याच्या प्रतिमेचा अनावरणाचा लाभ मला मिळाला हे मी माझे भाग्य समजतो, असे गौरवोदगार माजी शिक्षण सभापती सुनील काटकर यांनी काढले.
संभाजीनगर ता. सातारा येथील ग्रामपंचायत कार्यालयात महाराष्ट्र भूषण ती.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रतिमेचे अनावरण प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर सरपंच सौ.दिपाली पंडीत, उपसरपंच सुभाष मगर, जि.प.सदस्या सौ.अर्चना देशमुख, पं.स.सदस्या रेखा शिंदे, माजी सरपंच सतिश माने, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव कणसे, ग्रा.पं.सदस्य अनिल खराडे, अॅड. सागर जाधव, सौ.संगीता तांगडे, जयवंत मोरे, अनिल पिसाळ, अलका कुंजीर, मोहन राजपोळ, अरूणराव कणसे, अमोल तांगडे, दादा तांगडे, राजे प्रतिष्ठानचे नितीन शिंदे, संतोष घाडगे, ग्रामसेवक बनसोडे, दै. ग्रामोध्दारचे उपसंपादक एकनाथ थोरात, नंदकुमार नलवडे, सुजीत बाबर, विजय वाघ यांची विशेष उपस्थिती होती.
पुढे बोलताना सुनिल काटकर म्हणाले, डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी रयतेचे राजे छ. शिवाजी महाराजांचे वंशज खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांना पुन्हा स्वतंत्र कार्यक्रम घेवून आमंत्रित करावे ते आवर्जुन उपस्थित राहतील अशी ग्वाही दिली.
आपल्या भाषणात जि.प.सदस्या सौ. अर्चना देशमुख म्हणाल्या, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे स्व.नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य खूप मोठे आहे. उन्हं, वारा याची तमा न बाळगता तुम्ही केवळ नानासाहेब यांच्यावर प्रेम ठेवून उपस्थितीत राहिला. आपण श्लोक म्हणतो, पाठ करतो पण आचरणात आणत नाही. आज नानासाहेबांच्या कार्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. संपूर्ण देशपातळीबरोबरच परदेशातील अमेरिका, सिंगापूर, दुबई येथे त्याचे विचार पोहचले आहेत. आज जिल्हा, तालुका पातळीवर बैठकांच्या रूपाने कार्य सुरूच आहे. भौतिक सुख जास्त आहे पण शांती मिळत नाही. मात्र पुढे जाण्यासाठी अध्यात्माची गरज आहे. शासनाच्या तंटामुक्त गाव, ग्रामस्वच्छता समित्या या केवळ कागदोपत्रीच आहेत. जलपुर्नरभरणा साठी शासन आज कोटयावधी रूपये खर्च करीत आहे. स्वच्छतेचा वसा घेवून धर्माधिकारी प्रतिष्ठानचे मावळे काम करीत आहेत.
ग्रा.पं.सदस्य जयवंत मोरे म्हणाले, ग्रा.पं. कार्यालयात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांची प्रतिमा लावल्याने त्याचे विचार पदाधिकारी वाढविण्यासाठी प्रयत्न करतील. स्वच्छतेच्या बाबतीत धर्माधिकारी यांचे कार्य अतुलनीय आहे. महान नेत्यांच्या प्रतिमा या उगवत्या पिढीसाठी प्रेरणास्थान ठरतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत संदीप चव्हाण यांनी केेले तर सचिन वागडोळे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांचे कार्य अतुलनीयः सुनील काटकर
RELATED ARTICLES