पुसेसावळी (प्रतिनिधी) : खटाव तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा पुसेसावळी-चोराडे रस्त्यावरील नांदणी पुल आ.बाळासाहेब पाटील यांच्या पुढाकाराने पूर्ण होऊन वाहतूकीस खुला झाल्यामुळे त्याची पाहणी करण्यास आलेले आमदार बाळासाहेब पाटील यांचे आभार पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांनी मानले. हा पुल पुर्वी कमी उंचीचा असल्यामुळे पुल पाण्याखाली सतत राहत होता. त्यामुळे मा.आमदार बाळासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्याने अर्थसंकल्प सन 2014-15 मधून सदर पुलासाठी रुपये 60.00लक्ष निधी प्राप्त होवून काम सुरु झाले होते.परंतु सदरचा निधी अपुरा असल्याने काही काम अपुरे राहिली होती. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्ती साठी शासनाकडे सतत मागणी केल्यामुळे या पुलाचा अँन्युटी हायब्रीड योजनेमद्धे समावेश झाला व त्याअंतर्गत सदर पुलाचे उर्वरीत काम पुर्ण करणेसाठी वारंवार शासकीय अधिकाऱ्यांना सुचना दिल्या, तरी या परिसरात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली असल्यामुळे या पुलाच्या बाजूने पर्यायी रस्ता केला आहे त्या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला असून मोठमोठे खड्डे पडलेले असल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडचणीत येत आहेत त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करताना शाळेतील विद्यार्थीवर्ग,टु-व्हिलर व वाहन धारकांना कसरत करावी लागत होती, त्यामुळे या पुलाच्या संदर्भात पुसेसावळी परिसरातील ग्रामस्थांनी आपल्या व्यथा आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे मांडल्या होत्या त्यामुळे पुलाच्या संदर्भातील गांभीर्याने दखल घेत आमदार बाळासाहेब पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रशासनास सांगून अपूर्ण असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून या पुलावरून वाहतूक सुरू करण्याचे आदेश दिले, सद्यस्तिथीस सदरच्या पुलावरुन वाहतूक सुरु झाली आहे त्याची पाहणी करताना वडगाव सरपंच मा.संतोष घार्गे, मा.वसंतराव घार्गे,युवा नेते श्रीनिवास पिसाळ ,सुरज चव्हाण,अविनाश घार्गे, पिटु घार्गे, तसेच सर्व ग्रामस्थ, शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिक्रिया:
बर्याच दिवसापासून प्रलंबित असणारा पुसेसावळी-चोराडे रस्त्यावरील नांदणी पुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अनेक अडचणीना तोंड देत मार्ग काढला आणि हे काम पूर्ण केले आहे, त्यामुळे आज नांदणी पुलावरून वाहतूक सुरू झाली आणि वाहनधारकांच्या व विद्यार्थी वर्गाच्या अडचणी दुर झाल्या यांचे समाधान होत आहे.