पाटण:- ( शंकर मोहिते ) नीसर्गावर होणारे अतिक्रमण वाढती जंगलतोड यामुळे होणारा पर्यावरणाचा -हास पृथ्वीवर येणारे नैसर्गिक संकट हे थांबवण्यासाठी मणदुरच्या काऊद-यावर मार्तंड जानिईदेवीच्या हजारो भाविक भक्तांनी जानाईदेवीचा गुलाल आणि खंडोबा चा भंडारा च्या उधळणीत शुक्रवारी सकाळी निसर्ग पुजा संपन्न झाली. यावेळी तिर्थक्षेत्र निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरी येथून येणाऱ्या मार्तंड – जानाईदेवी पालखी सोहळ्याचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्षा आयेशा सय्यद, पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते, कार्याध्यक्ष बाबासो सुतार, मनसे तालुका अध्यक्ष गोरख नारकर, शिवसेना पाटण शहर अध्यक्ष शंकरराव कुंभार, विश्वहिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष काशिनाथ विभूते, भाजपा सोशल मीडिया चे पाटण शहर अध्यक्ष अनिल बोधे, महादेव खैरमोडे आदी मान्यवरांनी जानाई-मार्तंड पायी पालखी सोहळ्याचे काऊद-यावर स्वागत केले.
निवकणे जानाईदेवी यात्रेनिमित्त जेजुरी येथून मार्तंड- जानाई भक्तांचा पायी पालखी सोहळा आठ दिवस प्रवास करत नऊव्या दिवशी सकाळी मणदुरे काऊद-यावर येतो. हा पालखी सोहळा गुरवारी मुक्कामी तारळे येथे होता. शुक्रवारी पहाटे हा पालखी सोहळा मणदुरे काऊद-यावर आला असता येथे पालखीचे पुजन करून स्वागत करण्यात आले. यावेळी जानाईदेवीचा गुलाल आणि खंडोबाचा भंडाराच्या उधळणीत हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत निसर्ग संवर्धनासाठी निसर्ग पुजा करण्यात आली. यावेळी सह्याद्रीच्या कड्या कपारीत राहणा-या निसर्ग संवर्धन करणा-या महिलांची साडी-चोळीने ओटी भरण्यात आली. व जानाई-मार्तंड अन्नदान ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी फलटण येथील निसर्ग युवा मंचच्या स्वच्छता दुतांनी काऊद-यावरील प्लासटीक कचरा गोळा करून स्वच्छता केली. यामध्ये रूद्र सोमनाथ काळे या पाच वर्षाच्या स्वच्छता दुताने स्वच्छतेचा संदेश देत काऊद-यावर स्वच्छता केली.
यावेळी बोलताना प्रांताधिकारी श्रीरंग तांबे म्हणाले निसर्ग पुजा हा जेजुरी करांचा स्तुत्य उपक्रम असुन आजच्या काळात निसर्गाचा होणारा -हास वाढते तापमान यामुळे निसर्गावर येणारी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. निसर्गाचे जतन झाले तरच पुढील काळ सुखकारक होईल.
तहसीलदार रामहरी भोसले म्हणाले निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण होण्यासाठी संदेश देणारी जेजुरी येथून निवकणे येथे येणारा जानाई-मार्तंड पायी पालखी सोहळा हा आजच्या काळातील यात्रांसाठी आदर्शवत आहे. तर पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे म्हणाले आजच्या काळात निसर्गाचे संवर्धन आणि संरक्षण झाले तरच या पृथ्वीवरील नीसर्ग साखळी सुरक्षित राहणार आहे. पाटण तालुक्यात निवकणे यात्रेनिमित्त होणारी निसर्ग पुजा हा जेजुरी करांचा स्तुत्य उपक्रम प्रत्येक यात्रेत साजरा व्हावा. अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जेजुरी येथून निवकणे येथे येणारा हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी जानाई-मार्तंड अन्नदान पालखी सोहळ्याचे संस्थापक राजेंद्र बारभाई, अध्यक्ष बाळकृष्ण बारभाई, शिवाजी कुतवल, जेजुरी च्या नगराध्यक्ष विनाताई सोनवणे, निसर्गप्रेमी विजयकुमार हरिश्चंद्रे यांनी परिश्रम घेतले.
निसर्ग संवर्धना साठी हजारो भक्तांच्या उपस्थितीत मणदुरच्या काऊद-यावर निसर्ग पुजा संपन्न
RELATED ARTICLES