Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीजिल्ह्यात विकासाचा सेतू उभारणार ः ना. नरेंद्र पाटील

जिल्ह्यात विकासाचा सेतू उभारणार ः ना. नरेंद्र पाटील

श्रीरामनवमीनिमित्त चाफळ येथे दिले जनतेला आश्‍वासन
चाफळ ः सातारा लोकसभा मतदार संघात विकासाचा सेतू उभा करण्याचे मी प्रभु श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊन आश्‍वासन देत आहे. चाफळ येथील या ऐतिहासिक वास्तूला तीर्थक्षेत्रचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच परिसराच्या विकासासाठी मी कटिबध्द असल्याचे शिवसेना, भाजपा, आरपीआय व महायुती मित्रपक्षाचे उमेदवार ना. नरेंद्र अण्णसाहेब पाटील यांनी सांगितले.
महायुतीच्या प्रचारार्थ आयोजित दौर्‍यातप्रसंगी श्रीरामनवमी निमित्त चाफळ ता. पाटण येथे श्रीरामाचे दर्शन घेऊन ते बोलत होते. यावेळी नरेंद्र पाटील, राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, युवा नेते संजय पाटील, विकास गायकवाड, शिवसेना भाजपा महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, गत दहा वर्षात विद्यमान खासदारांनी या ऐतिहासिक भूमिकीकडे दुर्लक्ष केले आहे. निवडून आल्यानंतर त्यांना जनतेचा विसर पडतो व निवडणुका आल्याकी जनतेचा कळवला उफाळून येतो, अशा या स्वार्थी लोकप्रतिनिधीचा काय उपयोग. यामुळे या भागाचा विकास कोठून होणार. येथील भूमिपुत्र रोजगारासाठी इतरत्र जात आहे, ही शोकांतिका आहे. मात्र यापुढे हे होणार नाही, कारण मी आपली जबाबदारी घेत आहे. औद्योगिक, शैक्षणिक, पर्यटनाच्याबाबतीत जिल्ह्याचा मोठा विकास घडवून आणण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे. सर्वचबाबतीत जिल्हा देशात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न करणार आहे. येथील शेतकरी, कष्टकरी ह स्वावलंबी झाला पाहिजे, हाच माझा निवडणूक लढविण्या मागचा हेतू आहे.
महिला सबलीकरण झाल्यातरच कुटुंबाची प्रगती होते. या परिसराला सीतामाईचे वरदान आहे, हे ओळखूनच येथील महिलांसाठी लघुउद्योग, कुटीरउद्योग, घरबसल्या हाताला काम मिळवून देणार आहे. मुली शिकल्या तर देश घडेल, प्रगती होईल. स्पर्धा परिक्षांमध्ये ग्रामीण भागातील मुले-मुलींना सहभागी करून देण्यासाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र उभारणार आहे. आज श्रीरामनवमीनिमित्त येथील जनतेला मी हेच वचन देऊ इच्छितो, माझ्या विजयानंतर मी आपणास दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी कटिबध्द राहीन. 23 एप्रिलला आपण धनुष्यबाणासमोरील बटण दाबून मला प्रचंड बहुमतानी विजयी करून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
वनवासातून जनतेला बाहेर काढणार
प्रभु रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगला. याप्रमाणे विद्यमान खासदारांच्या नाकर्तेपणामुळे येथील जनता स्थानिक समस्यांचा वनवास गेली दहा वर्षे भोगत आहे. आज श्रीरामनवमीनिमित्त येेथील जनतेला या प्रभू रामचंद्रांच्या चाफळ भूमीत वचन देतो की, यापुढे आपला समस्यारुपी वनवास संपण्यासाठी मी दिवसरात्र एक करून आपल्यासाठी काम करेन.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular