Wednesday, February 25, 2026
Homeठळक घडामोडीदुष्काळ निवारणासाठी माण-खटावला राष्ट्रवादीच्यावतीने 1 कोटीचा निधी

दुष्काळ निवारणासाठी माण-खटावला राष्ट्रवादीच्यावतीने 1 कोटीचा निधी

खटाव : दुष्काळाची दाहकता, राज्यकर्त्यांना म्हणावी इतकी वाटत नाही, तथापि आदरणीय पवारसाहेबांना दुष्काळाची तीव्रता आणि शेतकर्‍यांच्या व्यथांची जाणिव असल्याने, दुष्काळी जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न शरदचंद्र पवारसाहेबांनी लोकसभेच्या निवडणुक निकालांच्या आधी सुरु केले होते, तो प्रयत्न निकालानंतरही त्यांनी चालुच ठेवला आहे. आज खटाव-कोरेगांव तालुक्यातील पाणी फौंडेशनच्या स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या गावांना त्यांनी आपला 1 कोटींचा खासदार निधी दिला असून, डिस्कळ पाणीपुरवठा योजनेकरीता खा. वंदना चव्हाण यांच्या खासदार निधीमधून भरीव निधी देण्याची घोषणा केली आहे. तसेच पवार चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पिण्याच्या पाण्यांचे टँकर सुरु करण्यात आले आहेत.
डिस्कळ येथून मोळ-मांजरवाडी नवीन पाणीपुरवठा योजना आमच्या आणि कोरेगांवचे लोकप्रिय आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रयत्नातुन मार्गी लावण्यात आली आहे. ही नवीन पाणी योजना पूर्ण झाल्यावर मोळ-मांजरवाडी या भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या भविष्यात भेडसावली जाणार नाही अशी महत्वपूर्ण आणि दिलासादायक माहीती सातारा लोकसभा मतदार संघाचे खा.उदयनराजे भोसले यांनी विविध दुष्काळी गांवांना भेटी देताना दिली.
राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री, खा. श्।रदचंद्रजी पवारसाहेब यांनी सातारा जिल्हयातील माण-खटाव-पूर्व कोरेगांव तालुक्यातील चिलेवाडी, नागेवाडी, डिस्कळ, मोळ, मांजरवाडी या गावांच्या दुष्काळाचा आढावा खा. उदयनराजे भोसले आणि कोरेगांवचे आ. शशिकांत शिंदे यांच्या समवेत घेतला त्यावेळी श्री. छ. उदयनराजे भोसले बोलत होते.
आज 1972 पेक्षाही मोठा दुष्काळ असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे या दुष्काळाची दाहकता भीषण आहे, प्यायला पाणी मिळण्याची मुश्किल होत असताना, जनावरे जगवायची कशंी हा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे, स्थलांतर करावे तरी जवळपास 50 कि.मी.च्या परिसरात पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे, त्यामुळे पवारसाहेबांना दुष्काळाची दाहकता समाजपुढे यावी, आणि दुष्काळग्रस्तांना सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतुन श्।क्य ती मदत उपलब्ध व्हावी म्हणून दुष्काळ दौरा आखला आहे. पवारसाहेबांच्या दौ-याच्या निमित्ताने दुष्काळग्रस्तांच्या जीवनात दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. आमच्या परिने आम्ही लागेल ते सहकार्य दुष्काळग्रस्तांना करीत असून, आमची संपूर्ण ताकद दुष्काळग्रस्तांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी वापरत आहेात असेही ख्।ासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले.
दरम्यान, पाण्याचे टॅन्कर सुरु करणे, टॅन्कर वाढवणे, धरणातील पाण्याची आवर्तने दुष्काळी भाागाकरीता सोडणे, चारा छावण्या वाढवणे, चारा दावणीला देणे इत्यादी दुष्काळी / टंचाई प्रश्‍नांवर तातडीने आणि विनाविलंब निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी, जिल्हाधिकारी यांनी, जिल्हयातील प्रमुख प्रशासकीय अधिकार्‍यांची आणि जिल्हयातील विध्।ानसभा, लोकसभा प्रतिनिधींचे संयुक्त टंचाई बैठक तातडीने बोलवावी अशी सूचना खा. उदयनराजे भोसले यांनी या दुष्काळी दौर्‍यात केली. त्यानुसार टंचाई बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन भवन, येथे दि.28 मे 19 रोजी सकाळी 10.30 वां. करण्यात आले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular