कोरेगाव मतदारसंघात ढाबा संस्कृती रुजविणार्या
जावलीकराला परत पाठविणार : डॉ. शालिनीताई पाटील
कोरेगाव : जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी ही सामान्य शेतकर्यांच्या कष्टातून झालेली आहे. कारखाना मोडून खाणार्या अजित पवार याला कारखान्यातून हाकलून काढणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव विधानसभा मतदारसंघात ढाबा संस्कृती रुजविणार्या जावलीकराला आता परत पाठविण्याची वेळ आली असून, ते काम सुध्दा करणार आहे, असा निर्धार माजी मंत्री डॉ. श्रीमती शालिनीताई पाटील यांनी केला.
सक्रीय राजकारणाला 60 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून त्यांनी कोरेगावात येऊन पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अॅड. वसंतराव फाळके, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अविनाश फाळके, कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव भोसले-पाटील, कार्यकारी संचालक किसन घाडगे, दरेचे सरपंच आनंदा जाधव, अभिजित फाळके, पोपटराव जगदाळे, रणजित फाळके उपस्थित होते. आपल्या जुन्या आठवणी ताज्या करत त्यांनी राजकारणात करावा लागलेला संघर्ष, स्त्री असल्याने अनेक ठिकाणी करावी लागलेली राजकीय तडजोड आणि अनेक ठिकाणी घ्यावी लागलेली माघार याचा त्यांनी उहापोह केला. माझ्या राजकीय वाटचालीचे माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम हे पहिल्या दिवसापासूनचे साक्षीदार होते, ते मला नेहमी झाशीची राणी म्हणत असत, अशी आठवण सांगत आता असे म्हणणारे कोणी राहिले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारखाना हा जीवनातील महत्वाचा घटक
सांगली जिल्हा लोकल बोर्डाची सदस्य म्हणून राजकीय कारकिर्द सुरु झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात केलेला प्रवेश, कायाचे शिक्षण घेताना शिवाजी विापीठात प्रथम येण्याचा मिळवलेला बहुमान याविषयी त्यांनी माहिती दिली. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाल्यास कोरेगाव आणि खटाव तालुक्याच्या विकासाला चालना मिळून, तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. कायम दुष्काळी असा शिा देखील पुसला जाईल, या हेतूने खासदार असतानाच कारखान्याची उभारणीचा करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या जाचक अटी शिथील करण्यास भाग पाडले आणि काही गोष्टींसाठी सर्वोध न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वोध न्यायालयाच्या निर्णयामुळेच जरंडेश्वर कारखान्याची उभारणी शक्य झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ऐनकेन प्रकारे कारखाना गिळला
राज्यात सर्वाधिक म्हणजे दहा कोटी रुपयांचे भागभांडवल उभे करुन आम्ही एकप्रकारे विक्रम केला. राज्य बँकेसह अन्य बँकांनी एकत्रित येऊन 24 कोटी रुपयांचे कर्ज दिले. विष्णू आण्णा पाटील यांनी याविषयात मदत केली. त्यानंतर कारखाना चांगला चालला होता. एकदा मोळी टाकण्याच्या कार्यक्रमाला अजित पवार याला प्रमुख पाहुणा म्हणून बोलविले, तो आला आणि कार्यक्रम झाला. कारखान्यावरील चेअरमन बंगल्यावर जेवण करत असताना कारखाना साईट चांगली आहे, असे तो म्हणाला होता. त्यावेळेस त्याच्या डोक्यात काय चालले आहे, याची कल्पना आली नाही. त्याने त्याचदिवशीच कारखाना मोडीत काढून स्वतःकडे घ्यायचा, असे ठरविले हे आम्हाला लक्षात आले नाही, त्यामुळे आमचा घात झाला. त्याचा डाव वेळीच आमच्या लक्षात आला नाही. त्याने ऐनकेन प्रकारे कारखाना गिळला असून, आम्ही विविध मार्गांनी न्यायालयात दाद मागत आहोत.
आता मुंबईच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु असून, 29 जून ही तारीख नेमण्यात आली आहे. कारखान्यासाठी दोन अधिकारी काम पाहत असून, त्यांच्या पगारासह न्यायालयाचे कामकाज करण्यासाठी मीच आर्थिक तरतूद करत आहे. कारखाना आमच्या ताब्यात देण्याची देवतांची इच्छा असावी की काय म्हणून मी लढा देत आहे. या लढ्यात आम्ही यशस्वी होणार असून, न्यायालयाच्या माध्यमातून हा कारखाना परत एकदा ताब्यात घेणार आहे. कोणत्याही परिस्थितीत अजित पवार याला जरंडेश्वर कारखान्यातून हाकलून काढणार आहे, असा ठाम निर्धार डॉ. पाटील यांनी केला.
फलटण-बारामतीला हाचे पाणी जाऊ देणार नाही
कोरेगावात दहा वर्षे आमदार म्हणून मिरवत असलेल्याने देखील अजित पवार यालाच साथ दिली आहे. कारखान्याच्या प्रत्येक कार्यक्रमाला तो उपस्थित राहत आहे. कारखाना आणि शेतकर्याच्या विषयावर तो काहीच बोलत नाही, गेल्यावर्षी कारखान्याने जाहीर केलेला ऊसाचा दर दिलेला नाही, त्याबाबत देखील तो बोलत नाही, म्हणजे त्याची अजित पवार यालाच साथ आहे. कोरेगाव तालुक्याच्या हाचे पाणी फलटण-बारामतीला जात आहे. धोम धरणाची उभारणीवेळी कोरेगाव तालुक्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्याची अंमलबजावणी होत नाही. मंत्रालयात पाणी वाटपाच्या बैठकांना आमदार उपस्थित राहत नाही, याचा अर्थ त्याची पाणी नेण्याला संमती आहे. आता कोरेगावच्या हाचे पाणी नेण्यास आमचा कडवा विरोध राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही आमच्या वाट्याचे पाणी देणार नाही, त्यासाठी वेळप्रसंगी लढा उभारावा लागला तरी चालेल, त्यात मागे राहणार नाही, असेही डॉ. पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.
चौकट : युवा पिढी बरबाद करण्याचे पाप ’त्याचेच’
कोरेगावातून दहा वर्षे आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. तालुक्यात दर्जेदार आणि ठोस विकासकामे केली. औोगिक वसाहतीचा आराखडा देखील आमच्याच काळात मंजूर झाला होता, मात्र दहा वर्षात त्यावर एक रुपयाचेही काम झाले नाही. 2009 मध्ये मी पुन्हा आमदार होऊ शकले असते, मात्र बारामतीतून ट्रकभर पैसा आणला. सर्वच ढाब्यांवर मटणाच्या जेवणावळी रंगल्या आणि दारुचा महापूर आला. युवापिढीला व्यसनाधीन करत बरबाद केले. त्यांच्या या आक्राळविक्राळ ताकदीपुढे आमची ताकद कमी पडली आणि माझा पराभव झाला. शशिकांत शिंदे हा स्वतःचा पैसा व्हाईट करायला येथे आला, दहा वर्षे तो आमदार आहे, मात्र त्याने कोणतेही ठोस आणि विधायक काम केले नाही. ढाबा संस्कृतीद्वारे त्याने युवापिढी बरबाद केली. हे सर्व रोखण्यासाठी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मी पुन्हा कोरेगाव तालुक्यात सक्रीय होणार असून, जावलीचे पार्सल परत जावलीला पाठविण्यासाठी विधानसभा निवडणुकीत योग्य आणि चांगल्या उमेदवाला पाठिंबा देणार आहे. त्याच्या विजयासाठी देखील प्रयत्न करणार आहे, असे डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवार याला जरंडेश्वर कारखान्यातून हाकलून काढणार
RELATED ARTICLES