रहिमतपूर : धोम व कण्हेर धरणातून पाणी सोडल्यामुळे व सतत पडणार्या पावसामुळे सातारा – रहिमतपूर रस्त्यावरील धामणेरच्या कृष्णा नदीतील पुराचे पाणी पुलाच्या कानाला लागले आहे. तासा तासाला पाण्याची पातळी वाढत असून पुलावरून पुराचे पाणी जाण्याची शक्यता आहे.
नदीच्या काठावरील गणपतीच्या मंदिरास पाण्याने पूर्ण वेढा दिला असून मंदिर परिसरातील गार्डन पाण्याखाली गेली आहे. स्मशानभूमीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. धामणेर गावात जाणा-या रस्त्यालगत पूराचे पाणी आले असून आणखी जादा पाणी धरणातून सोडले तर गावात जाणारा रस्ता बंद होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोरेगावच्या प्रांताधिकारी कीर्ती नलवडे, तहसिलदार शिंदे, मंडल अधिकारी सावंत, यांनी धामणेर येथे तात्काळ भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच नदीचे पाणी वाढण्याची शक्यता गृहीत धरुन दुपारी चार वाजल्यापासून या पुलावरील वहातूक बंद करण्याच्या सूचना संबंधित कर्मचा-याना दिल्या. रहिमतपूरचे पोलिस हवलदार कांबळे, मोरे, पोलिस पाटील जयवंत क्षीरसागर व महसूलचे अधिकारी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. वेळोवेळी प्रवाशांना व ग्रामस्थांना अलर्ट राहण्याच्या सूचना देत आहेत.
धामणेर पुल वाहतूकीसाठी बंद
RELATED ARTICLES